शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

रस्ते बांधल्याबद्दल मिळालं नोबेल - भाजपा नेत्यांनी तोडले तारे

By admin | Updated: December 12, 2014 21:26 IST

एमपीमधल्या भाजपा सरकारमधल्या अनेक नेत्यांना सत्यार्थींना नोबेल मिळाल्याची गंधवार्ताही नव्हती.

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. १२ - मध्प्रदेशातल्या विदीशा येथील कैलाश सत्यार्थी यांना बालकामगार क्षेत्रामध्ये तसेच मुलांच्या कल्याणासाठी गेल्या ३५ वर्षांत दिलेल्या योगदानाबद्दल नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले आणि जगभरात त्यांचा सन्मान करण्यात आला. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे खुद्द एमपीमधल्या भाजपा सरकारमधल्या अनेक नेत्यांना याची गंधवार्ताही नव्हती. अनेक नेत्यांनी तर वृत्तवाहिन्यांना बाईट देताना हा पुरस्कार भाजपा आमदार कैलाश विजयवर्गीयांनाच मिळाल्याची समजूत करून घेत भाजपा सरकारचं व विजयवर्गीयांचं गुणगान सुरू केलं. एका नेत्यानं सांगितलं की इंदोरमधले रस्ते कैलाशजींनी खूप चांगले केले, इंदोर सिटी निर्माण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
तर एका नेत्यानं चक्क केंद्रात मोदी व राज्यात शिवराजसिंह चौहान चांगलं काम करत असल्यामुळं नोबेल मिळाल्याचं ठोकून दिलं आणि आम्हा सगळ्या भाजपा कार्यकर्त्यांचंच हे यश असल्याचं सांगितलं. एकीकडे देशात सत्यार्थींच्या पुरस्कारामुळं आनंदाचं वातावरण असताना त्यांच्या राज्यातल्या सत्ताधारींना मात्र सत्यार्थींचं काम आणि त्यांचा जागतिक पातळीवर झालेला गौरव याची गंधवार्ताही नसल्याचं समोर आलं आहे. आणखी वाईट बाब म्हणजे असे तारे तोडणा-यांमध्ये मध्यप्रदेशच्या कायदा मंत्र्यांचाही समावेश आहे. अखेर कैलाश विजयवर्गीयांना जेव्हा हे सगळं समजलं, त्यावेळी त्यांनी सत्यार्थी हे भूमिगत राहून काम करतात त्यामुळे लोकांना त्यांची माहिती नाही, मी मात्र आमदार असल्यामुळे प्रसिद्धीत असतो त्यामुळे गैरसमज झालेला अशी सारवाासारव केली.
कैलाश सत्यार्थींना त्यांच्या राज्यातल्या सत्ताधारी नेत्यांचं अज्ञान समजलं तर त्यांची काय अवस्था होईल याची कल्पनाच केलेली बरी.