शहरं
Join us  
Trending Stories
1
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
2
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
3
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
4
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
5
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
6
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
7
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
8
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
9
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
10
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
11
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
12
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
13
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
14
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
15
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
16
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
17
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
18
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
19
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
20
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा

शेतकरी आंदोलनांवरून नितीश कुमार यांचे मोदींवर टीकास्त्र

By admin | Updated: June 12, 2017 15:59 IST

राजकीय वर्तुळामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपा यांच्यात जवळीक होत असल्याची चर्चा असतानाच आज नितीश कुमार यांनी

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 12 - राजकीय वर्तुळामध्ये  बिहारचे मुख्यमंत्री  नितीश कुमार आणि भाजपा यांच्यात जवळीक होत असल्याची चर्चा असतानाच आज नितीश कुमार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय धोरण बनवण्यात अपयशी ठरलेल्या मोदी सरकारवर नितीश कुमार यांनी टीकास्र सोडले आहे. तसेच हिंमत असेल तर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये तात्काळ निवडणुका घेण्याचे आव्हानही त्यांनी दिले.  आज बऱ्याच दिवसांनंतर नितीश कुमार यांनी मोदींना थेट लक्ष्य केले. ते म्हणाले, "2014 साली झालेल्या निवडणुकीच्या आधी भाजपाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मोठमोठी आश्वासने दिली  होती. तेव्हा मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते आणि ते आश्वासने देत सुटले होते. तसेच भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा या आश्वासनांचा समावेश करण्यात आला होता."  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय धोरण ठरवण्यात अपयशी ठरल्याने नितीश यांनी मोदींवर टीका केली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे मूल्य सर्वप्रथम निश्चित झाले पाहिजे. मंदासोरला झालेला गोळीबार किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आंदोलनासारखी घटना झाल्यावर कर्जमाफीची घोषणा करणे हा वरवरचा उपाय आहे. त्यातून शेतकऱी आणि शेतीवरील संकट दूर होणार नाही, असे नितीश कुमार म्हणाले.  यावेळी महात्मा गांधी यांच्याबाबत अनुद्गार काढणारे भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर नितीश कुमार यांनी टीका केली. तसेच शेतीची समस्या सोडवण्यासाठी योगा करण्याचा सल्ला देणारे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचीही त्यांनी खिल्ली उडवली.  गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये निवडणुका घेण्याच्या पुड्या सोडणाऱ्यांनाही त्यांनी रोखठोक इशारा दिला. मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आताचा बिहार आणि उत्तर प्रदेशात निवडणुका घ्याव्यात असे आव्हान त्यांनी दिले.