शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

शेतकरी आंदोलनांवरून नितीश कुमार यांचे मोदींवर टीकास्त्र

By admin | Updated: June 12, 2017 15:59 IST

राजकीय वर्तुळामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपा यांच्यात जवळीक होत असल्याची चर्चा असतानाच आज नितीश कुमार यांनी

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 12 - राजकीय वर्तुळामध्ये  बिहारचे मुख्यमंत्री  नितीश कुमार आणि भाजपा यांच्यात जवळीक होत असल्याची चर्चा असतानाच आज नितीश कुमार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय धोरण बनवण्यात अपयशी ठरलेल्या मोदी सरकारवर नितीश कुमार यांनी टीकास्र सोडले आहे. तसेच हिंमत असेल तर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये तात्काळ निवडणुका घेण्याचे आव्हानही त्यांनी दिले.  आज बऱ्याच दिवसांनंतर नितीश कुमार यांनी मोदींना थेट लक्ष्य केले. ते म्हणाले, "2014 साली झालेल्या निवडणुकीच्या आधी भाजपाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मोठमोठी आश्वासने दिली  होती. तेव्हा मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते आणि ते आश्वासने देत सुटले होते. तसेच भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा या आश्वासनांचा समावेश करण्यात आला होता."  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय धोरण ठरवण्यात अपयशी ठरल्याने नितीश यांनी मोदींवर टीका केली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे मूल्य सर्वप्रथम निश्चित झाले पाहिजे. मंदासोरला झालेला गोळीबार किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आंदोलनासारखी घटना झाल्यावर कर्जमाफीची घोषणा करणे हा वरवरचा उपाय आहे. त्यातून शेतकऱी आणि शेतीवरील संकट दूर होणार नाही, असे नितीश कुमार म्हणाले.  यावेळी महात्मा गांधी यांच्याबाबत अनुद्गार काढणारे भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर नितीश कुमार यांनी टीका केली. तसेच शेतीची समस्या सोडवण्यासाठी योगा करण्याचा सल्ला देणारे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचीही त्यांनी खिल्ली उडवली.  गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये निवडणुका घेण्याच्या पुड्या सोडणाऱ्यांनाही त्यांनी रोखठोक इशारा दिला. मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आताचा बिहार आणि उत्तर प्रदेशात निवडणुका घ्याव्यात असे आव्हान त्यांनी दिले.