शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमार पाचव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार

By admin | Updated: November 15, 2015 03:04 IST

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चारीमुंड्या चीत करणाऱ्या महाआघाडीच्या विधिमंडळ पक्षनेते पदी निवड झालेले संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांना राज्यपाल

पाटणा : बिहारमधील विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चारीमुंड्या चीत करणाऱ्या महाआघाडीच्या विधिमंडळ पक्षनेते पदी निवड झालेले संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांना राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी शनिवारी सरकार स्थापनेसाठी पाचारण केले. नितीशकुमार येत्या २० नोव्हेंबरला पाचव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ होतील. राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा सादर केल्यावर राजभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले असल्याचे कुमार यांनी सांगितले. २० नोव्हेंबरला दुपारी २ वाजता गांधी मैदानात त्यांचा शपथविधी होईल. संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने निवडणुकीपूर्वी महाआघाडी स्थापन केली होती. आपल्या मंत्रिमंडळात तीनही पक्षांचे नेते असतील आणि त्यांनाही याचवेळी शपथ देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाच्या आकाराबद्दल विचारले असता संवैधानिक तरतुदींनुसार सदस्य संख्या निश्चित केली जाईल, असे ते म्हणाले. तत्पूर्वी सायंकाळी नितीशकुमार यांची एकमताने महाआघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. विधिमंडळ पक्षांच्या संयुक्त बैठकीत राजद संसदीय मंडळाच्या प्रमुख राबडीदेवी यांनी ६४वर्षीय नितीशकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि काँग्रेसचे सरचिटणीस सी.पी. जोशी यांनी त्याला अनुमोदन दिले. चारा घोटाळ्यात शिक्षा झाल्याने या निवडणुकीपासून वंचित राहिलेले राजद प्रमुख लालुप्रसाद यादव हेसुद्धा या वेळी उपस्थित होते. मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाचे सार्थक करण्याकरिता आपल्याला कठोर परिश्रम करावे लागणार आहेत, असे नितीशकुमार यांनी नंतर महाआघाडीच्या आमदारांना संबोधित करताना सांगितले. दुपारी नितीशकुमार यांची संयुक्त जनता दल (जदयू) विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली होती. बिहारमधील काँग्रेसच्या आमदारांनी विधिमंडळ पक्ष नेतेपदाची निवड आणि नितीशकुमार सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिले आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय झाला. पक्षाचे महासचिव सी.पी. जोशी यांनी नंतर पत्रकारांना ही माहिती दिली. येत्या १९ नोव्हेंबरला दिल्लीत पक्षश्रेष्ठी राज्यातील नेत्यांसोबत विचारविनिमय करून सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.