शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

नशिराबादचा पाणी प्रश्न मंत्रालयात धाव ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांची भेट; वाघूरच्या पाण्याची मागणी

By admin | Updated: February 5, 2016 00:32 IST

नशिराबाद : येथील पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी व तात्पुरता एमआयडीसीचे पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी मंत्रालयात धाव घेऊन पाणीप्रश्नावर चर्चा झाली. त्याबाबत लवकरच तोडगा निघणार असून आठवडाभरात एमआयडीसचे पाणी मिळण्याची शक्यता आहे.

नशिराबाद : येथील पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी व तात्पुरता एमआयडीसीचे पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी मंत्रालयात धाव घेऊन पाणीप्रश्नावर चर्चा झाली. त्याबाबत लवकरच तोडगा निघणार असून आठवडाभरात एमआयडीसचे पाणी मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या दीड महिन्यापासून पाणी टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत आहे. कायमस्वरूपी पाणी योजनाच कार्यान्वित नसल्याने दरवर्षी पाण्यासाठी वणवण आहे. सध्या आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहे. पर्यायी योजनाच नसल्याने जळगाव एमआयडीसीकडून होणार्‍या पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच एमआयडीसीचे ४ कोटी ९५ लाख ३८ हजार ८३५ रुपये थकीत बाकी ग्रामपंचायतीने भरली नसल्याने एमआयडीसीने पाणी देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे सरपंच खिलचंद रोटे, उपसरपंच कीर्तीकांत चौबे, ग्रामपंचायत सदस्य- लालचंद पाटील, योगेश पाटील आदी शिष्टमंडळाने मंत्रालयात जाऊन महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावरून महसूलमंत्री खडसे यांनी एमआयडीसी विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावरून पाणीप्रश्न सुटण्याबाबत संकेत मिळाले असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. ८ ते १० दिवसातच पाणीप्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, शिष्टमंडळाने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी नशिराबाद येथील पाणी प्रश्नाबाबत माहिती दिली व वाघूर धरणाच्या डाव्या कालव्यातून पाच कि.मी. अंतरावरील निमगाव जवळील सी.आर. गेटमधून पाणी सोडावे अशी मागणी केली. जलसंपदामंत्री महाजन यांनी जिल्हाधिकार्‍यांशी याबाबत चर्चा केली. नशिराबादची पाणी योजना वाघूर नदीवरूनच असल्याने पाणी मिळावे, असा आग्रह ग्रामपंचायतीने केला आहे. त्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सहमती दर्शविली असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले आहे.