शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

नशिराबादचा पाणी प्रश्न मंत्रालयात धाव ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांची भेट; वाघूरच्या पाण्याची मागणी

By admin | Updated: February 5, 2016 00:32 IST

नशिराबाद : येथील पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी व तात्पुरता एमआयडीसीचे पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी मंत्रालयात धाव घेऊन पाणीप्रश्नावर चर्चा झाली. त्याबाबत लवकरच तोडगा निघणार असून आठवडाभरात एमआयडीसचे पाणी मिळण्याची शक्यता आहे.

नशिराबाद : येथील पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी व तात्पुरता एमआयडीसीचे पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी मंत्रालयात धाव घेऊन पाणीप्रश्नावर चर्चा झाली. त्याबाबत लवकरच तोडगा निघणार असून आठवडाभरात एमआयडीसचे पाणी मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या दीड महिन्यापासून पाणी टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत आहे. कायमस्वरूपी पाणी योजनाच कार्यान्वित नसल्याने दरवर्षी पाण्यासाठी वणवण आहे. सध्या आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहे. पर्यायी योजनाच नसल्याने जळगाव एमआयडीसीकडून होणार्‍या पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच एमआयडीसीचे ४ कोटी ९५ लाख ३८ हजार ८३५ रुपये थकीत बाकी ग्रामपंचायतीने भरली नसल्याने एमआयडीसीने पाणी देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे सरपंच खिलचंद रोटे, उपसरपंच कीर्तीकांत चौबे, ग्रामपंचायत सदस्य- लालचंद पाटील, योगेश पाटील आदी शिष्टमंडळाने मंत्रालयात जाऊन महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावरून महसूलमंत्री खडसे यांनी एमआयडीसी विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावरून पाणीप्रश्न सुटण्याबाबत संकेत मिळाले असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. ८ ते १० दिवसातच पाणीप्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, शिष्टमंडळाने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी नशिराबाद येथील पाणी प्रश्नाबाबत माहिती दिली व वाघूर धरणाच्या डाव्या कालव्यातून पाच कि.मी. अंतरावरील निमगाव जवळील सी.आर. गेटमधून पाणी सोडावे अशी मागणी केली. जलसंपदामंत्री महाजन यांनी जिल्हाधिकार्‍यांशी याबाबत चर्चा केली. नशिराबादची पाणी योजना वाघूर नदीवरूनच असल्याने पाणी मिळावे, असा आग्रह ग्रामपंचायतीने केला आहे. त्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सहमती दर्शविली असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले आहे.