शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
2
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
3
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
4
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
5
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
6
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
7
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
8
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
9
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
10
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
11
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
12
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
13
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
14
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
15
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
16
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
17
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
18
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
19
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!

नशिराबादचा पाणी प्रश्न मंत्रालयात धाव ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांची भेट; वाघूरच्या पाण्याची मागणी

By admin | Updated: February 5, 2016 00:32 IST

नशिराबाद : येथील पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी व तात्पुरता एमआयडीसीचे पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी मंत्रालयात धाव घेऊन पाणीप्रश्नावर चर्चा झाली. त्याबाबत लवकरच तोडगा निघणार असून आठवडाभरात एमआयडीसचे पाणी मिळण्याची शक्यता आहे.

नशिराबाद : येथील पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी व तात्पुरता एमआयडीसीचे पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी मंत्रालयात धाव घेऊन पाणीप्रश्नावर चर्चा झाली. त्याबाबत लवकरच तोडगा निघणार असून आठवडाभरात एमआयडीसचे पाणी मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या दीड महिन्यापासून पाणी टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत आहे. कायमस्वरूपी पाणी योजनाच कार्यान्वित नसल्याने दरवर्षी पाण्यासाठी वणवण आहे. सध्या आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहे. पर्यायी योजनाच नसल्याने जळगाव एमआयडीसीकडून होणार्‍या पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच एमआयडीसीचे ४ कोटी ९५ लाख ३८ हजार ८३५ रुपये थकीत बाकी ग्रामपंचायतीने भरली नसल्याने एमआयडीसीने पाणी देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे सरपंच खिलचंद रोटे, उपसरपंच कीर्तीकांत चौबे, ग्रामपंचायत सदस्य- लालचंद पाटील, योगेश पाटील आदी शिष्टमंडळाने मंत्रालयात जाऊन महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावरून महसूलमंत्री खडसे यांनी एमआयडीसी विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावरून पाणीप्रश्न सुटण्याबाबत संकेत मिळाले असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. ८ ते १० दिवसातच पाणीप्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, शिष्टमंडळाने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी नशिराबाद येथील पाणी प्रश्नाबाबत माहिती दिली व वाघूर धरणाच्या डाव्या कालव्यातून पाच कि.मी. अंतरावरील निमगाव जवळील सी.आर. गेटमधून पाणी सोडावे अशी मागणी केली. जलसंपदामंत्री महाजन यांनी जिल्हाधिकार्‍यांशी याबाबत चर्चा केली. नशिराबादची पाणी योजना वाघूर नदीवरूनच असल्याने पाणी मिळावे, असा आग्रह ग्रामपंचायतीने केला आहे. त्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सहमती दर्शविली असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले आहे.