शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

निहलानींची लवकरच उचलबांगडी?

By admin | Updated: January 4, 2016 01:18 IST

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या उचलबांगडीच्या रूपाने बॉलीवूडला लवकरच नववर्षाची भेट मिळू शकते. निहलानींना हटविण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या उचलबांगडीच्या रूपाने बॉलीवूडला लवकरच नववर्षाची भेट मिळू शकते. निहलानींना हटविण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा दिल्लीतील सत्तावर्तुळात आहे. सेन्सॉर बोर्डाच्या मुद्द्यावर केंद्रातील सरकारने पहिल्यांदाच सक्रियता दाखवत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि राकेश मेहरा यांची एक समिती स्थापन केली असून, ही समिती सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजाबाबत सरकारला अहवाल देणार आहे, त्याआधारे सरकार निहलानींंना निरोप देण्याची शक्यता आहे. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात अडकली आहे; परंतु निहलानी सर्वाधिक वादग्रस्त ठरले. अलीकडेच आपण भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत, असे विधान करून त्यांनी आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी विराजमान व्यक्तीने एखाद्या राजकीय पक्षाप्रति अशी उघडपणे निष्ठा व्यक्त करण्याचा प्रकार यापूर्वी घडल्याचे कानी नाही. निहलानी यांना त्यांच्या पात्रतेमुळे नाही, तर भाजपा सत्तेवर आल्याने निष्ठेचे बक्षीस म्हणून सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्षपद मिळाल्याचे उघड आहे. अध्यक्षपद मिळाल्यानंतर निहलानी यांनी सर्वांना सोबत घेऊन चालायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. निहलानींच्या काम करण्याच्या पद्धतीवरून अनेक वाद निर्माण झाले. बॉलीवूडचे लोक त्यांच्यावर एवढे नाराज झाले, की त्यांना हटविण्याची मोहीम सुरू झाली. सेन्सॉर बोर्डातीलच काही मंडळी निहलानी हटाव मोहिमेचे नेतृत्व करीत होती. अशोक पंडित आणि चंद्रप्रकाश द्विवेदी यांसारखे काही जण निहलानींविरुद्ध उघडपणे समोर आले. विशेष म्हणजे पंडित आणि द्विवेदी हे दोघेही भाजपाचे निष्ठावान मानले जातात. निहलानी यांच्यानंतर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्षपद आपल्याला मिळण्याचे स्वप्न ते रंगवत आहेत. एका निष्ठावानाची उचलबांगडी केल्यानंतर सरकार या दोन निष्ठावानांपैकी एकाला ही खुर्ची देते, की तिसऱ्याच कोणाला अध्यक्षपदाचे बक्षीस मिळते हे पाहणे रंजक ठरणार आहे. येणारा काळच याचे उत्तर देईल. जर सत्ताधारी पक्षाप्रति निष्ठा व्यक्त केल्यानेच हे पद मिळणार असेल तर सेन्सॉर बोर्डात सुधारणा घडून येण्याची अपेक्षा न केलेलीच बरी. सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या आणि बॉलीवूडच्या निर्मात्यांचा विश्वास संपादित केलेल्या व्यक्तीकडे हे पद सोपविण्याची आवश्यकता आहे. तथापि, काय भूमिका घ्यावी हे सर्वस्वी सत्ताधाऱ्यांवर अवलंबून आहे.