शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

नायजेरियन विद्यार्थ्यांवर हल्ला, ५ जणांना अटक

By admin | Updated: March 29, 2017 01:47 IST

नायजेरियाच्या चार विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याच्या आरोपावरून पाच जणांना ग्रेटर नॉयडा पोलिसांनी उत्तर प्रदेशात

ग्रेटर नॉयडा : नायजेरियाच्या चार विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याच्या आरोपावरून पाच जणांना ग्रेटर नॉयडा पोलिसांनी उत्तर प्रदेशात अटक केली. स्थानिकांनी नायजेरियन लोकांना इतके बेदम मारले की त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना मारहाण होत असताना, ते वाचवा, वाचवा असे जोरजोरात ओरडत होते, पण त्यांना वाचवायला कोणीही पुढे आले नाही. नायजेरियन नागरिकाच्या कारचीही जमावाने नासधूस केली.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या नारजेरियन विद्यार्थ्यांनी त्यांच्या दुतावासाला आणि सुषमा स्वराज यांना सोशल मीडियावरून मारहाणीची माहिती दिली. बारावीत शिकणाऱ्या मनीषला (१७) काही विदेशी लोकांनी पळवून नेऊन त्याला अमली पदार्थ दिले व त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असा आरोप या मुलाच्या पालकांनी केला. गेल्या आठवड्यात मनीषचा मृत्यू झाल्यानंतर येथील रहिवाशांनी येथे मेणबत्ती मोर्चा काढला होता व त्यानंतर चार नायजेरियन विद्यार्थ्यांवर हल्ला झाला. मनीषच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही नायजेरियनांना पुरावा नसल्यामुळे सोडून देण्यात आल्यानंतर रहिवाशांनी निषेध मोर्चा काढला होता. ग्रेटर नॉयडाच्या पोलिस अधीक्षक सुजाता सिंह म्हणाल्या की, मोर्चाच्या दरम्यान मोर्चेकरू हिंसक बनले व त्यांनी रस्त्यात जो कोणता अफ्रिकन दिसेल त्याला मारहाण सुरू केली. जमाव अन्साल मॉलमध्येही गेला व तेथे त्याने अफ्रिकन्सना मारहाण सुरू करून दहशत निर्माण केली. पोलिसांनी अफ्रिकनांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी नेले, असे सुजाता सिंह म्हणाल्या. मनीषच्या पालकांनी आरोप केलेल्या नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी क्लिन चिट दिलेली नाही, अशी माहिती ग्रेटर नॉयडाच्या पोलिस अधीक्षकांनी म्हटले. हल्लेखोर जमावाला आवरण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पाच जणांना घटनास्थळीच अटक करण्यात आली. त्या ठिकाणी खोडसाळपणा करणाऱ्या अनेकांची ओळख पटली असून संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण झाले आहे. गुन्हा दाखल झाला असून त्यानुसार कारवाई केली जात आहे, अशी माहिती सह पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) दलजित चौधरी यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. (वृत्तसंस्था)मुख्यमंत्र्यांशी बोलले : स्वराजनवी दिल्ली : आफ्रिकन विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलल्या. तत्पूर्वी, विदेशी विद्यार्थ्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, असे आवाहन स्वराज यांना केले होते. हल्ला झाला त्या भागात राहणे जीविताला धोका निर्माण करणारे असल्याचे विदेशी नागरिकांचे म्हणणे होते. केंद्र सरकार तातडीने पावले उचलत असून उत्तर प्रदेश सरकारनेही मारहाणीच्या या दुर्दैवी घटनेची तटस्थपणे व योग्य चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचे सुषमा स्वराज टिष्ट्वटरवर म्हणाल्या.