शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

नायजेरियन विद्यार्थ्यांवर हल्ला, ५ जणांना अटक

By admin | Updated: March 29, 2017 01:47 IST

नायजेरियाच्या चार विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याच्या आरोपावरून पाच जणांना ग्रेटर नॉयडा पोलिसांनी उत्तर प्रदेशात

ग्रेटर नॉयडा : नायजेरियाच्या चार विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याच्या आरोपावरून पाच जणांना ग्रेटर नॉयडा पोलिसांनी उत्तर प्रदेशात अटक केली. स्थानिकांनी नायजेरियन लोकांना इतके बेदम मारले की त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना मारहाण होत असताना, ते वाचवा, वाचवा असे जोरजोरात ओरडत होते, पण त्यांना वाचवायला कोणीही पुढे आले नाही. नायजेरियन नागरिकाच्या कारचीही जमावाने नासधूस केली.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या नारजेरियन विद्यार्थ्यांनी त्यांच्या दुतावासाला आणि सुषमा स्वराज यांना सोशल मीडियावरून मारहाणीची माहिती दिली. बारावीत शिकणाऱ्या मनीषला (१७) काही विदेशी लोकांनी पळवून नेऊन त्याला अमली पदार्थ दिले व त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असा आरोप या मुलाच्या पालकांनी केला. गेल्या आठवड्यात मनीषचा मृत्यू झाल्यानंतर येथील रहिवाशांनी येथे मेणबत्ती मोर्चा काढला होता व त्यानंतर चार नायजेरियन विद्यार्थ्यांवर हल्ला झाला. मनीषच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही नायजेरियनांना पुरावा नसल्यामुळे सोडून देण्यात आल्यानंतर रहिवाशांनी निषेध मोर्चा काढला होता. ग्रेटर नॉयडाच्या पोलिस अधीक्षक सुजाता सिंह म्हणाल्या की, मोर्चाच्या दरम्यान मोर्चेकरू हिंसक बनले व त्यांनी रस्त्यात जो कोणता अफ्रिकन दिसेल त्याला मारहाण सुरू केली. जमाव अन्साल मॉलमध्येही गेला व तेथे त्याने अफ्रिकन्सना मारहाण सुरू करून दहशत निर्माण केली. पोलिसांनी अफ्रिकनांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी नेले, असे सुजाता सिंह म्हणाल्या. मनीषच्या पालकांनी आरोप केलेल्या नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी क्लिन चिट दिलेली नाही, अशी माहिती ग्रेटर नॉयडाच्या पोलिस अधीक्षकांनी म्हटले. हल्लेखोर जमावाला आवरण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पाच जणांना घटनास्थळीच अटक करण्यात आली. त्या ठिकाणी खोडसाळपणा करणाऱ्या अनेकांची ओळख पटली असून संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण झाले आहे. गुन्हा दाखल झाला असून त्यानुसार कारवाई केली जात आहे, अशी माहिती सह पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) दलजित चौधरी यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. (वृत्तसंस्था)मुख्यमंत्र्यांशी बोलले : स्वराजनवी दिल्ली : आफ्रिकन विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलल्या. तत्पूर्वी, विदेशी विद्यार्थ्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, असे आवाहन स्वराज यांना केले होते. हल्ला झाला त्या भागात राहणे जीविताला धोका निर्माण करणारे असल्याचे विदेशी नागरिकांचे म्हणणे होते. केंद्र सरकार तातडीने पावले उचलत असून उत्तर प्रदेश सरकारनेही मारहाणीच्या या दुर्दैवी घटनेची तटस्थपणे व योग्य चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचे सुषमा स्वराज टिष्ट्वटरवर म्हणाल्या.