शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

शेतकरी धोरणाची नव्याने चिकित्सा

By admin | Updated: January 18, 2016 03:31 IST

शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांबाबतच्या आठ वर्षे जुन्या राष्ट्रीय धोरणाचा नव्याने आढावा घेण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे

नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांबाबतच्या आठ वर्षे जुन्या राष्ट्रीय धोरणाचा नव्याने आढावा घेण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. खुद्द केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली.कृषी मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयासमक्ष प्रतिज्ञापत्र सादर केले. शेतकऱ्यांसाठी बनलेले राष्ट्रीय धोरण आठ वर्षे जुने आहे. या सुमारे आठ वर्षे जुन्या राष्ट्रीय धोरणाचा नव्याने आढावा घेणे गरजेचे आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. पंजाबस्थित युथ कमल आॅर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या उत्तरादाखल सरकारने हे प्रतिज्ञापत्र सादर केले. देशातील कृषी क्षेत्र मोठ्या संकटात असून सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.गतवर्षी ३० आॅक्टोबरला जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय शेतकरी धोरणाचा नव्याने आढावा घेण्यासंदर्भातील दृष्टिकोन स्पष्ट न केल्याबद्दल केंद्र सरकारला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)