शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर संकट परिस्थितीसाठी नेहरु-गांधी कुटुंब जबाबदार - भाजपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 11:08 IST

काश्मीरमध्ये सध्याच्या घडीला जी काही परिस्थिती आहे त्यासाठी नेहरु-गांधी आणि अब्दुल्ला कुटुंब जबाबदार असल्याचं भाजपाने म्हटलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी तिस-या पक्षाने मध्यस्थी करावी असं वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने (भाजपा) नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांना धारेवर धरलं आहे. फारुख अब्दुल्ला यांचं हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार असल्याचं भाजपाने म्हटलं आहे. भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी तर, काश्मीरमध्ये सध्याच्या घडीला जी काही परिस्थिती आहे त्यासाठी नेहरु-गांधी आणि अब्दुल्ला कुटुंब जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. 
 
"फारुख अब्दुल्ला यांचं वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आणि निषेधार्ह आहे. काश्मीर अजूनही धगधगतोय त्याच्यामागे अब्दुल्ला आणि नेहरु-गांधी कुटुंब कारण आहे", असं सुधांशू त्रिवेदी बोलले आहेत. 
 
आणखी वाचा
काश्मीरमधील हिंसाचाराला सरकारचे धोरण कारणीभूत; राहुल गांधींचा आरोप
सर्व सैन्य लावले तरी दहशतवाद पुरून उरेल - फारुख अब्दुल्ला
 
भाजपा नेते दिलीप घोष यांनीही फारुख अब्दुल्ला यांच्यावर टीका केली आहे. अब्दुला यांचं वक्तव्य अर्थहिन असल्याचं ते बोलले आहेत. "फारुख अब्दुल्ला यांचं राजकारण काही कामाचं नाही. कधीतरी ते फुटीरवाद्यांच्या समर्थनार्थ बोलतात तर कधी पाकिस्तानच्या समर्थनार्थ बोलत असतात. त्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावा किंवा लक्ष द्यावं असं मला वाटत नाही", असं दिलीप घोष बोलले आहेत.
 
काय बोलले होते फारुख अब्दुल्ला ?
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीर समस्येवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं होतं की, "भारताला काश्मीर समस्या सोडवायची असेल तर चीन किंना अमेरिकेची मदत घेतली पाहिजे". 
अब्दुल्ला बोलले होते की, "आपण पाकिस्तान आणि चीनसोबत युद्द करु शकत नाही. कारण जर आपल्याकडे अणुबॉम्ब असतील तर त्यांच्याकडेही अणुबॉम्ब आहेत. त्यामुळे हा मुद्दा चर्चेने सोडवला गेला पाहिजे. 
 
अब्दुल्ला यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीका करत संताप व्यक्त केला होता. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी, मी फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्याचा निषेध करतो असं सांगितलं होतं. जेव्हा फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री होते तेव्हा पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे असं बोलत होतं. आणि आता असं वक्तव्य करत आहेत. 
 
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही वक्तव्याचा निषेध करताना काश्मीरच्या वादात कोणत्याही तिसऱ्या पक्षाने हस्तक्षेप करण्याची गरजच नाही, असे सांगितले. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरला भारतापासून कोणीही वेगळे करू शकत नाही, असे सांगतच तिथे अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकतर्फे हालचाली सुरू असून, पाक व चीन यांच्यात जी गुप्त चर्चा सुरू आहे, त्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कडाडून टीका होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच काश्मीरमध्ये हिंसाचार वाढला असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.