शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

काश्मीर संकट परिस्थितीसाठी नेहरु-गांधी कुटुंब जबाबदार - भाजपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 11:08 IST

काश्मीरमध्ये सध्याच्या घडीला जी काही परिस्थिती आहे त्यासाठी नेहरु-गांधी आणि अब्दुल्ला कुटुंब जबाबदार असल्याचं भाजपाने म्हटलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी तिस-या पक्षाने मध्यस्थी करावी असं वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने (भाजपा) नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांना धारेवर धरलं आहे. फारुख अब्दुल्ला यांचं हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार असल्याचं भाजपाने म्हटलं आहे. भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी तर, काश्मीरमध्ये सध्याच्या घडीला जी काही परिस्थिती आहे त्यासाठी नेहरु-गांधी आणि अब्दुल्ला कुटुंब जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. 
 
"फारुख अब्दुल्ला यांचं वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आणि निषेधार्ह आहे. काश्मीर अजूनही धगधगतोय त्याच्यामागे अब्दुल्ला आणि नेहरु-गांधी कुटुंब कारण आहे", असं सुधांशू त्रिवेदी बोलले आहेत. 
 
आणखी वाचा
काश्मीरमधील हिंसाचाराला सरकारचे धोरण कारणीभूत; राहुल गांधींचा आरोप
सर्व सैन्य लावले तरी दहशतवाद पुरून उरेल - फारुख अब्दुल्ला
 
भाजपा नेते दिलीप घोष यांनीही फारुख अब्दुल्ला यांच्यावर टीका केली आहे. अब्दुला यांचं वक्तव्य अर्थहिन असल्याचं ते बोलले आहेत. "फारुख अब्दुल्ला यांचं राजकारण काही कामाचं नाही. कधीतरी ते फुटीरवाद्यांच्या समर्थनार्थ बोलतात तर कधी पाकिस्तानच्या समर्थनार्थ बोलत असतात. त्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावा किंवा लक्ष द्यावं असं मला वाटत नाही", असं दिलीप घोष बोलले आहेत.
 
काय बोलले होते फारुख अब्दुल्ला ?
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीर समस्येवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं होतं की, "भारताला काश्मीर समस्या सोडवायची असेल तर चीन किंना अमेरिकेची मदत घेतली पाहिजे". 
अब्दुल्ला बोलले होते की, "आपण पाकिस्तान आणि चीनसोबत युद्द करु शकत नाही. कारण जर आपल्याकडे अणुबॉम्ब असतील तर त्यांच्याकडेही अणुबॉम्ब आहेत. त्यामुळे हा मुद्दा चर्चेने सोडवला गेला पाहिजे. 
 
अब्दुल्ला यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीका करत संताप व्यक्त केला होता. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी, मी फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्याचा निषेध करतो असं सांगितलं होतं. जेव्हा फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री होते तेव्हा पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे असं बोलत होतं. आणि आता असं वक्तव्य करत आहेत. 
 
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही वक्तव्याचा निषेध करताना काश्मीरच्या वादात कोणत्याही तिसऱ्या पक्षाने हस्तक्षेप करण्याची गरजच नाही, असे सांगितले. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरला भारतापासून कोणीही वेगळे करू शकत नाही, असे सांगतच तिथे अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकतर्फे हालचाली सुरू असून, पाक व चीन यांच्यात जी गुप्त चर्चा सुरू आहे, त्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कडाडून टीका होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच काश्मीरमध्ये हिंसाचार वाढला असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.