शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
4
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
5
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
6
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
7
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
8
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
9
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
10
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
11
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
12
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
13
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
14
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
15
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
16
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
17
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
18
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
19
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
20
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?

काश्मीर संकट परिस्थितीसाठी नेहरु-गांधी कुटुंब जबाबदार - भाजपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 11:08 IST

काश्मीरमध्ये सध्याच्या घडीला जी काही परिस्थिती आहे त्यासाठी नेहरु-गांधी आणि अब्दुल्ला कुटुंब जबाबदार असल्याचं भाजपाने म्हटलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी तिस-या पक्षाने मध्यस्थी करावी असं वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने (भाजपा) नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांना धारेवर धरलं आहे. फारुख अब्दुल्ला यांचं हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार असल्याचं भाजपाने म्हटलं आहे. भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी तर, काश्मीरमध्ये सध्याच्या घडीला जी काही परिस्थिती आहे त्यासाठी नेहरु-गांधी आणि अब्दुल्ला कुटुंब जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. 
 
"फारुख अब्दुल्ला यांचं वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आणि निषेधार्ह आहे. काश्मीर अजूनही धगधगतोय त्याच्यामागे अब्दुल्ला आणि नेहरु-गांधी कुटुंब कारण आहे", असं सुधांशू त्रिवेदी बोलले आहेत. 
 
आणखी वाचा
काश्मीरमधील हिंसाचाराला सरकारचे धोरण कारणीभूत; राहुल गांधींचा आरोप
सर्व सैन्य लावले तरी दहशतवाद पुरून उरेल - फारुख अब्दुल्ला
 
भाजपा नेते दिलीप घोष यांनीही फारुख अब्दुल्ला यांच्यावर टीका केली आहे. अब्दुला यांचं वक्तव्य अर्थहिन असल्याचं ते बोलले आहेत. "फारुख अब्दुल्ला यांचं राजकारण काही कामाचं नाही. कधीतरी ते फुटीरवाद्यांच्या समर्थनार्थ बोलतात तर कधी पाकिस्तानच्या समर्थनार्थ बोलत असतात. त्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावा किंवा लक्ष द्यावं असं मला वाटत नाही", असं दिलीप घोष बोलले आहेत.
 
काय बोलले होते फारुख अब्दुल्ला ?
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीर समस्येवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं होतं की, "भारताला काश्मीर समस्या सोडवायची असेल तर चीन किंना अमेरिकेची मदत घेतली पाहिजे". 
अब्दुल्ला बोलले होते की, "आपण पाकिस्तान आणि चीनसोबत युद्द करु शकत नाही. कारण जर आपल्याकडे अणुबॉम्ब असतील तर त्यांच्याकडेही अणुबॉम्ब आहेत. त्यामुळे हा मुद्दा चर्चेने सोडवला गेला पाहिजे. 
 
अब्दुल्ला यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीका करत संताप व्यक्त केला होता. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी, मी फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्याचा निषेध करतो असं सांगितलं होतं. जेव्हा फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री होते तेव्हा पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे असं बोलत होतं. आणि आता असं वक्तव्य करत आहेत. 
 
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही वक्तव्याचा निषेध करताना काश्मीरच्या वादात कोणत्याही तिसऱ्या पक्षाने हस्तक्षेप करण्याची गरजच नाही, असे सांगितले. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरला भारतापासून कोणीही वेगळे करू शकत नाही, असे सांगतच तिथे अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकतर्फे हालचाली सुरू असून, पाक व चीन यांच्यात जी गुप्त चर्चा सुरू आहे, त्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कडाडून टीका होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच काश्मीरमध्ये हिंसाचार वाढला असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.