शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

आर्थिक सुधारणांचा वेग वाढणे गरजेचे

By admin | Updated: February 27, 2016 01:58 IST

भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास जरी विकासाच्या दिशेने होत असला तरी, या विकासाचा वेग वाढविण्यासाठी आणि त्याला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक सुधारणांचा वेग

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास जरी विकासाच्या दिशेने होत असला तरी, या विकासाचा वेग वाढविण्यासाठी आणि त्याला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक सुधारणांचा वेग वाढविणे गरजेचे आहे, असे मत संसदेत शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. केंद्रीय वित्तमंत्रालयाचे मुख्य वित्तीय सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल तयार केला आहे. आर्थिक सुधारणांचा वेग वाढविण्याची सूचना करतानाच त्यावर नेमकेपणाने भाष्य करण्यात आले आहे. यामध्ये, कामकाजात पारदर्शकता आणतानाच विविध क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीच्या धोरणात शिथिलता आणणे, प्रमुख पिकांच्या विम्याकडे लक्ष देणे व त्याचा बारकाईने आढावा घेणे, पंतप्रधान जन-धन योजनेच्या अनुषंगाने वित्तीय समायोजनाचे धोरण प्रभावीपणे राबविणे, बचत, गुंतवणूक क्षेत्रातील योजनांचा नियमित आढावा घेणे, ऊर्जाक्षेत्राकडे विशेषत्वाने लक्ष देणे आदी गोष्टी सुचविण्यात आल्या आहेत.दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीमधील घसरणीचा ट्रेन्ड कायम राहाणार असल्याचे दिसून येत असून याचा निश्चित आणि सकारात्मक असा परिणाम महागाई नियंत्रणावर होणार आहे. तसेच सातव्या वेतन आयोगामुळे सरकारी खजिन्यातील वित्तीय तूट फार वाढणार नसल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महागाई आटोक्यात राहील, असे हा अहवाल म्हणतो. तसेच वस्तू व सेवा कर (जीएसटी), विविध घटकांवर देण्यात येणारे अनुदान, वित्तीय तुटीची स्थिती, विविध क्षेत्रांतील घडामोडी आणि त्यांचा अर्थकारणावर होणारा परिणाम आदी अनेक मुद्यांचा सर्वंकष वेध आर्थिक सर्वेक्षण अहवालात घेण्यात आला.(लोकमत न्युज नेटवर्क) खतांवरील अनुदान कमी करण्याचा प्रस्तावआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे सरकारची इंधनांवरील अनुदानात बचत झाली असली तरी दुसरीकडे खतांवरील अनुदानाच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली असून हा खर्च कसा कमी करता येईल यावर सरकारने विचार करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्य करण्यात आले आहे.एकट्या खतांच्या अनुदानावर होणारा खर्च हा देशाच्या वार्षिक सकल उत्पन्नाच्या ०.८ टक्क्यांवर पोहोचला असून खतांमध्ये काळाबाजारही मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या मुद्यावर बोट ठेवण्यात आले आहे.करदात्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न हवेतसध्या करदात्यांची देशातील टक्केवारी ही जेमतेम साडेपाच टक्के इतकी आहे. सरकारने कर संकलन वाढविण्याच्या दृष्टीने करदात्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.किमान साडेपाच टक्क्यांवरून २३ टक्के करदाते अशी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच, याकरिता तूर्तास कर आकारणीच्या रचनेत कोणताही बदल करू नये असे सुचित करण्यात आले आहे.