शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

भारतीय दंड संहितेत बदल करण्याची गरज - राष्ट्रपती प्रणब मुखर्जी

By admin | Updated: February 27, 2016 20:00 IST

देशद्रोह कायद्यावरुन देशभरात चर्चा सुरु असताना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी भारतीय दंड संहितेत (आयपीसी) बदल करण्याची गरज असल्यांच सुचवलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
कोच्ची, दि. 27 - देशद्रोह कायद्यावरुन देशभरात चर्चा सुरु असताना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी भारतीय दंड संहितेत (आयपीसी) बदल करण्याची गरज असल्यांच सुचवलं आहे. 21 व्या शतकातल्या गरजांची पुर्तता करण्यासाठी भारतीय दंड संहितेची उजळणी करण्याची गरज आहे. तसंच गेली अनेक वर्ष पारंपारिक पद्धतीने सुरु असलेल्या पोलीस व्यवस्थेतदेखील बदल करण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती प्रणब मुखर्जी बोलले आहेत. 
 
गेल्या 155 वर्षात आयपीसीमध्ये फार कमी बदल झाले आहेत. खुप कमी गुन्ह्यांची प्राथमिक गुन्ह्यांच्या तसंच शिक्षापात्र यादीत नोंद झाली असल्याचं राष्ट्रपती प्रणब मुखर्जी बोलले आहेत. भारतीय दंड संहितेची 155 वर्ष साजरे करण्यासाठी कोच्चीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 
 
अजूनही ब्रिटिशांनी त्यांच्या फायद्यासाठी लागू केलेले नियम आपल्या संहितेत आहेत. तर दुसरीकडे अनेक नवे गुन्हे समोर आले आहेत ज्यांची व्याख्या तयार करुन त्यांचा संहितेत समावेश करणं गरजेचं आहे असं मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. आर्थिक गुन्ह्यांमुळे देशाच्या विकास, प्रगतीत अडथळे येत असल्याचंदेखील राष्ट्रपती प्रणब मुखर्जी बोलले आहेत. जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर देशद्रोहाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर कलम 124 ए मध्ये बदल करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. 
 
पोलिसांनी केलेल्या कारवाईवर त्यांची प्रतिमा बनते, पोलिसांनी कायदा लागू करण्याच्या एकेरी भुमिकेतून पुढे जाण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सांगितल. भारतीय दंड संहिता 1 जानेवारी 1862 पासून लागू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल पी सदाशिवम, मुख्यमंत्री ओमन चंडी उपस्थित होते.