शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय दंड संहितेत बदल करण्याची गरज - राष्ट्रपती प्रणब मुखर्जी

By admin | Updated: February 27, 2016 20:00 IST

देशद्रोह कायद्यावरुन देशभरात चर्चा सुरु असताना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी भारतीय दंड संहितेत (आयपीसी) बदल करण्याची गरज असल्यांच सुचवलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
कोच्ची, दि. 27 - देशद्रोह कायद्यावरुन देशभरात चर्चा सुरु असताना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी भारतीय दंड संहितेत (आयपीसी) बदल करण्याची गरज असल्यांच सुचवलं आहे. 21 व्या शतकातल्या गरजांची पुर्तता करण्यासाठी भारतीय दंड संहितेची उजळणी करण्याची गरज आहे. तसंच गेली अनेक वर्ष पारंपारिक पद्धतीने सुरु असलेल्या पोलीस व्यवस्थेतदेखील बदल करण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती प्रणब मुखर्जी बोलले आहेत. 
 
गेल्या 155 वर्षात आयपीसीमध्ये फार कमी बदल झाले आहेत. खुप कमी गुन्ह्यांची प्राथमिक गुन्ह्यांच्या तसंच शिक्षापात्र यादीत नोंद झाली असल्याचं राष्ट्रपती प्रणब मुखर्जी बोलले आहेत. भारतीय दंड संहितेची 155 वर्ष साजरे करण्यासाठी कोच्चीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 
 
अजूनही ब्रिटिशांनी त्यांच्या फायद्यासाठी लागू केलेले नियम आपल्या संहितेत आहेत. तर दुसरीकडे अनेक नवे गुन्हे समोर आले आहेत ज्यांची व्याख्या तयार करुन त्यांचा संहितेत समावेश करणं गरजेचं आहे असं मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. आर्थिक गुन्ह्यांमुळे देशाच्या विकास, प्रगतीत अडथळे येत असल्याचंदेखील राष्ट्रपती प्रणब मुखर्जी बोलले आहेत. जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर देशद्रोहाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर कलम 124 ए मध्ये बदल करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. 
 
पोलिसांनी केलेल्या कारवाईवर त्यांची प्रतिमा बनते, पोलिसांनी कायदा लागू करण्याच्या एकेरी भुमिकेतून पुढे जाण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सांगितल. भारतीय दंड संहिता 1 जानेवारी 1862 पासून लागू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल पी सदाशिवम, मुख्यमंत्री ओमन चंडी उपस्थित होते.