शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

कोळसा घोटाळा ही निव्वळ कॅगची कल्पना नव्हे नायडू : भाजपच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

नवी दिल्ली : कोळसा खाणप˜्यांसाठी धातू आणि सिमेंट कंपन्यांनी लावलेली चढ्या दराची बोली आणि लिलावाची यशस्विता पाहता कोळसा घोटाळा खरा असल्याचे आणि तो निव्वळ कॅगच्या कल्पनेतून समोर आला नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे भाजपच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले असल्याचा दावा संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केला आहे.

नवी दिल्ली : कोळसा खाणपट्ट्यांसाठी धातू आणि सिमेंट कंपन्यांनी लावलेली चढ्या दराची बोली आणि लिलावाची यशस्विता पाहता कोळसा घोटाळा खरा असल्याचे आणि तो निव्वळ कॅगच्या कल्पनेतून समोर आला नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे भाजपच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले असल्याचा दावा संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केला आहे.
कोळसा घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी भाजपने जोर लावला होता. कोणतेही नुकसान झाले नसल्याचा तत्कालीन अर्थमंत्र्यांनी केलेला दावा चुकीचा होता, असेही ते म्हणाले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी कोणताही घोटाळा घडला नसल्याचा दावा केला होता. देशाचे १.८६ लाख कोटी रुपयांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. २० खाणींसाठी योग्य आणि पारदर्शकरीत्या लिलाव करण्याचा मोदी सरकारने घेतलेला निर्णय देशाच्या फायद्याचाच आहे. केवळ चार दिवसांमध्ये बोली ६० हजार कोटींच्या वर गेल्या आहेत. खनिजसंपन्न राज्यांना त्याचा अधिकाधिक लाभ होईल. सध्या १९ खाणपट्ट्यांचा लिलाव होत असून यापैकी १४ खाणपट्टे यापूर्वीच ८० हजार कोटी रुपयांना विकले गेले आहेत, अशी माहितीही नायडू यांनी दिली.
--------------------
१५ लाख कोटी मिळण्याची अपेक्षा
नव्या लिलाव प्रक्रियेतून १५ लाख कोटी रुपये गोळा होण्याची शक्यता आहे, तथापि अनेक बोली विश्लेषकांच्या अपेक्षेपलीकडे गेल्या आहेत.सर्वाधिक कोळसा ग्राहक असलेल्या देशामध्ये अमेरिकेला मागे टाकत चीननंतर दुसरे स्थान भारताला मिळण्याची अपेक्षा आहे. मागणीनुसार पुरवठा करण्यात अपयश आल्यामुळे कोल इंडिया लिमिटेडचा कोळसा क्षेत्रातील एकाधिकार मोडित काढण्यात आला आहे.