शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नयनतारा सेहगल यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2016 20:30 IST

देशातील वाढत्या असहिष्णूतेचा निषेध म्हणून आपले साहित्य अकादमी पुरस्कार परत करणा-या नामांकित लेखकांपैकी काहीजण पुन्हा आपले पुरस्कार स्वीकारण्यास राजी झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २२ -  देशातील वाढत्या असहिष्णूतेचा निषेध म्हणून आपले साहित्य अकादमी पुरस्कार परत करणा-या नामांकित लेखकांपैकी काहीजण  पुन्हा आपले पुरस्कार स्वीकारण्यास राजी झाले आहेत. देशात पुरस्कार वापसीची मोहिम सुरु करणा-या प्रख्यात लेखिका नयनतारा सेहगल यांनी आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत स्वीकारला आहे. 
राजस्थानचे लेखक नंद भारव्दाज यांनी अकादमीकडून जो प्रतिसाद मिळाला त्यावर समाधानी असल्याचे सांगितले. देशात जातीयवादी विचार आणि कृतीला जे खतपाणी घातले जात होते त्यावर अकादमीने धारण केलेल्या मौनाचा निषेध म्हणून अनेक लेखकांनी आपले साहित्य अकादमी पुरस्कार परत केले. 
सेहगल आणि भारव्दाज यांचा पुरस्कार परत स्वीकारण्याचा निर्णय इतरांसाठी उदहारण असला तरी, यावर अजूनही साहित्यिकांमध्ये मतभेद आहेत. अकादमीचे वर्तन आणि कृती समाधानकारक आहे त्यामुळे मी पुरस्कार परत स्वीकारण्याचा निर्णय घेतला असे भारव्दाज यांनी सांगितले. त्यांनी आपला पुरस्कार आणि त्यासाठी मिळालेली ५० हजाराची रोख रक्कम परत केली होती. 
दिलेला पुरस्कार परत स्वीकारणे धोरणाच्या विरोधात असल्याचे अकादमीने मला पत्र लिहून कळवले. त्यामुळे मी पुरस्कार परत स्वीकारला. पुरस्काराच्या रक्कमेचा चांगल्या विधायक कामासाठी उपयोग करीन असे नयनतारा सेहगल यांनी सांगितले.