शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल सहा महिने उलटून गेले तरीही राज्यमंत्री अधिकारांविनाच; उरले फक्त पदापुरते
2
आजचे राशीभविष्य : ०५ जून २०२५; आज क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल, शुभ कार्याची प्रेरणा मिळेल
3
संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय
4
अकरावीसाठी १२.२ लाख अर्ज; आज शेवटचा दिवस; ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती
5
विशेष नव्हे, आता थेट पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन सिंदूरमुळे विरोधकांकडून होती मागणी
6
जय श्रीराम! इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क यांनी अयोध्येत घेतले रामललाचे दर्शन
7
१००ची वस्तू १९ हजारांना; बंदी असूनही UAEमार्गे पाकशी जोडलेला व्यापार भरभराटीला
8
जातनिहाय जनगणना देशासाठी का महत्त्वाची? नेमका कुणाला, किती फायदा? जाणून घेऊया
9
दहिसर ते अंधेरी मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिका ठरल्या कार्बन न्युट्रल कॉरिडॉर
10
एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान
11
बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी
12
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
13
नवी मुंबईची बस अंधेरीत जळाली; प्रवाशांची सुखरूप सुटका; शॉर्टसर्किटचा संशय
14
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
15
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
16
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
17
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
18
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
19
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
20
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO

नक्षली नेत्यांसह २५ जणांचा खात्मा

By admin | Updated: October 25, 2016 05:00 IST

आंध्र-ओडिशा सीमेवर सुरक्षा दलांसोबतच्या धुमश्चक्रीत सोमवारी २५ माओवादी मारले गेले. मृतांत माओवाद्यांच्या दोन प्रमुख नेत्यांसह सात महिलांचा समावेश आहे. या चकमकीत आंध्र प्रदेश ग्रेहाऊंडचा

- अंबिका प्रसाद कानुंगो,  भुवनेश्वरआंध्र-ओडिशा सीमेवर सुरक्षा दलांसोबतच्या धुमश्चक्रीत सोमवारी २५ माओवादी मारले गेले. मृतांत माओवाद्यांच्या दोन प्रमुख नेत्यांसह सात महिलांचा समावेश आहे. या चकमकीत आंध्र प्रदेश ग्रेहाऊंडचा एक जवान शहीद, तर दुसरा जखमी झाला. आंध्र-ओडिशा सीमेवरील चित्रकोंडा या दुर्गम भागात ही चकमक झाली.ओडिशा पोलीस आणि ग्रेहाऊंडच्या संयुक्त कारवाईनंतर घटनास्थळी २५ मृतदेह आढळून आले. यातील काही मृतदेह महिलांचे आहेत. चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षलवादी मारले गेले असले, तरी काही पळून गेल्याचा संशय आहे, असे मलकानगिरीचे पोलीस अधीक्षक मित्रभानू महापात्र यांनी सांगितले. गजारला रवे उर्फ उदय आणि चलापती या उच्चस्तरीय माओवादी नेत्यांचा मृतांत समावेश असण्याची शक्यता आहे. या दोघांच्या शिरावर प्रत्येकी २० लाख रुपयांचे बक्षीस होते. गुप्तचर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळाहून १० रायफली, ४ एके-४७ रायफली, ३ एसएलआर, किट बॅग्स आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला असून, शोधमोहीम सुरूच आहे, असे ओडिशाचे पोलीस महासंचालक के. बी. सिंग यांनी सांगितले. माओवाद्यांच्या आंध्र-ओडिशा बॉर्डर स्पेशल झोन कमिटीचे लोक पानस्पुत ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाली होती. ओडिशा पोलिसांनी या माहितीची खातरजमा केल्यानंतर ग्रेहाऊंडने पुढाकार घेत कारवाई केली. चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह मलकानगिरी येथे आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. नक्षलवादी येण्या-जाण्यासाठी मलकानगिरी भागाचा वापर करतात. याच जिल्ह्यात सप्टेंबर २०१३ मध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीत १३ माओवादी मारले गेले होते. तत्पूर्वी माओवाद्यांनी २९ जून २००८ रोजी गे्रहाऊंडच्या जवानांना नेत असलेल्या बोटीवर अलामपाका येथे हल्ला केला होता. यात ग्रेहाऊंडच्या ३५ जवानांसह ३८ जण मारले गेले होते. जवानांना हेलिकॉप्टरद्वारे मदतमाओवाद्यांसोबतच्या चकमकीत जखमी झालेला आंध्र प्रदेश ग्रेहाऊंडचा जवान अबुबाकर याचा येथील रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती विशाखापट्टणमचे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक राहुल देव शर्मा यांनी दिली. आंध्र-ओडिशा सीमेवरील चकमकीत आणखी एका जवानासह अबुबाकर जखमी झाला होता. या दोघांना घटनास्थळाहून हेलिकॉप्टरद्वारे आणून येथील किंग जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, दुर्दैवाने अबुबाकर याचा मृत्यू झाला. दुसऱ्या जवानावर उपचार सुरू आहेत. ग्रेहाऊंड हे आंध्र प्रदेशचे नक्षलवादविरोधी पथक आहे.