शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
2
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
3
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
4
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
5
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
7
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
8
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
9
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
10
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
11
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
12
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
13
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
14
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
15
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
16
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
17
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
18
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
19
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
20
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!

देशी गायींप्रमाणे बैलही होणार दुर्मीळ

By admin | Updated: May 12, 2014 19:48 IST

* न्यायालयाचा शर्यतीवरील बंदीचा परिणामगणपती कोळी : कुरुंदवाड बदलती यांत्रिकी शेती यामुळे शेतकर्‍यांकडील बैलांची संख्या घटली आहे. खिलारी जातिवंत बैल शर्यतींसाठी पाळले जात आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने शर्यतीवर कायमची बंदी आणल्याने देशी गायींप्रमाणे बैलही दुर्मीळ होण्याची शक्यता आहे.पूर्वी ग्रामीण भागात बहुतेक शेतकर्‍यांजवळ बैल असत. शेतीच्या कामांबरोबर यात्रा, जत्रा, वाहतूक, प्रवासासाठी ...


* न्यायालयाचा शर्यतीवरील बंदीचा परिणाम
गणपती कोळी : कुरुंदवाड
बदलती यांत्रिकी शेती यामुळे शेतकर्‍यांकडील बैलांची संख्या घटली आहे. खिलारी जातिवंत बैल शर्यतींसाठी पाळले जात आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने शर्यतीवर कायमची बंदी आणल्याने देशी गायींप्रमाणे बैलही दुर्मीळ होण्याची शक्यता आहे.
पूर्वी ग्रामीण भागात बहुतेक शेतकर्‍यांजवळ बैल असत. शेतीच्या कामांबरोबर यात्रा, जत्रा, वाहतूक, प्रवासासाठी गाडीला जुंपण्यासाठी बैलांचा वापर होत असे. वाहतुकीची साधने नसल्याने ग्रामीण भागातील जीवन या बैलांवर चालत असे, तर शहरी भागात एक्का गाडी करून हमाली करण्यासाठी बैलांचा वापर होत असे. मात्र, बदलत्या काळानुसार शेतीनेही कात टाकली आहे. यांत्रिक शेतीमुळे घरोघरी शेतकर्‍यांच्या गोठ्यातील बैल कमी होऊन त्याठिकाणी ट्रॅक्टर आला आहे. शेतीच्या झटपट कामामुळे शेतकरी ट्रॅक्टरचाच वापर करू लागला आहे. त्यामुळे बैल पाळून भाडेतत्त्वावर काम करणार्‍या बैल मालकाला कामाअभावी बैल न परवडणारा होत असल्याने बैलांची संख्या घटली आहे. तसेच शहरातील वाहतुकीसाठी ट्रक-टेम्पोसारखी छोटी-मोठी वाहतुकीची साधने निर्माण झाल्यामुळे शहरातील एक्का बैलगाडीही हद्दपार झाली आहे.
ग्रामीण भागात शेतीच्या कामासाठी भाडेतत्त्वावर काम करणारे बैलगाडी मालक तुरळकच आहेत. मात्र, शर्यत शौकिनांची संख्या जास्त असल्याने प्रत्येक गावात शर्यतीसाठी बैलांची जोपासना केली आहे. त्यामुळे बैलांची संख्या अद्याप तरी जिवंत आहे. शर्यतीमध्ये बैलांना अमानुष मारहाण करणे, शेपूट चावणे, बॅटरीने शॉक देणे अशा प्रकारांमुळे प्राणी मित्र संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. एस. राधाकृष्णन यांनी बैलगाडी शर्यतीवर कायमचीच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शर्यतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बैलांची जिवंत असलेली संख्या हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.
पूर्वी घरोघरी शेतकर्‍यांकडून देशी गायींची जोपासना केली जात असे. मात्र, शेतकर्‍यांकडून सत्त्वयुक्त दुधापेक्षा आर्थिकतेला महत्त्व दिल्याने देशी गायींची जागा जर्सी गायींनी घेतली आहे. त्यामुळे देशी गायी दुर्मीळ झाल्या आहेत. शेतकर्‍याला चार पैसे दिसत असले तरी सत्त्वयुक्त दुधाला व शारीरिक स्वास्थ्याला तो मुकला आहे. शर्यतीच्या निमित्ताने ग्रामीण भागात जातिवंत बैलांची जोपासना केली जात आहे. मात्र, आता शर्यतीलाही कायमची बंदी मिळाल्याने देशी गायींप्रमाणे बैलही दुर्मीळ होण्याची शक्यता आहे.