शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

राष्ट्रगीत हाच मंत्र : दिलशाद गार्डनमध्ये दररोज बांधली जाते भारतमातेची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 04:42 IST

प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपला एकदाचा! वाहतूक सिग्नलजवळ हौसेने घेतलेला प्लास्टिकचा तिरंगा आता रस्त्याचा कडेला दिसेल.

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपला एकदाचा! वाहतूक सिग्नलजवळ हौसेने घेतलेला प्लास्टिकचा तिरंगा आता रस्त्याचा कडेला दिसेल. आठवडाभराने एखादी स्वयंसेवी संस्था रस्त्यावर विखुरलेला तिरंगा गोळा करण्यासाठी पुढे येईलच! आपले देशप्रेम मग थेट १५ आॅगस्टला उफाळून येईल! पण देशाचे स्मरण सहामाही नव्हे तर रोज व्हायला हवे. दिल्लीच्या दिलशाद गार्डनमधील एलआयसी कॉलनीत ते दररोज होते. भारतमाता मंदिरात देशासाठी पूजा बांधली जाते.देवीदेवतांची मंदिरे उभारल्या गेली, मात्र भारतमातेचा आपल्याला विसर पडला. याच जाणिवेतून कोणत्याही दैवतापेक्षा श्रेष्ठ असलेल्या भारतमातेचे मंदिर डॉ. अरविंद कुमार गुप्त यांनी उभारले. स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान दिलेल्यांच्या मोजक्या तसबिरी, अष्टभुजाधारी भारतमातेची प्रतिमा उभारून हे मंदिर १५ आॅगस्ट २००९ रोजी त्यांनी सर्वांसाठी खुले केले गेले. आज मंदिरात ३१५ छायाचित्रे आहेत.मंदिरात धूप-अगरबत्ती, नैवैद्य, श्लोक, मंत्र प्रार्थना होते. भारतमातेच्या मंदिरात मात्र दररोज राष्ट्रगीत म्हटले जाते. दिवा तेवत ठेवण्याऐवजी भारतमातेसमोर तिरंगा फडकवला जातो. शालेय विद्यार्थी, युवक-युवतींची या मंदिरात नेहमी गर्दी असते. देशाप्रति असलेल्या कर्तव्याची जाण मंदिरात प्रवेश करताना होतेच !स्वामी विवेकानंद म्हणाले होते - ‘पुढची शंभर वर्षे आपले दैवत फक्त भारतमाता असले पाहिजे!’ हेच जणू मंदिराचे संस्थापक डॉ. अरविंद गुप्त यांचे जीवनध्येय आहे. राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांच्या परिवारातील डॉ. अरविंद यांचे वडील सुन्नूलाल बिश्वारी स्वातंत्र्यसैनिक होते. अरविंद यांच्या आईचे १० आॅगस्ट २००९ रोजी निधन झाले. आईच्या निधनाच्या अवघ्या पाचच दिवसात त्यांनी मंदिराची कोनशिला ठेवली. आई-वडिलांच्या स्मरणार्थ डॉ. अरविंद यांनी हे मंदिर उभारले आहे.देश संचलनाचे सूत्र भारतमातेच्या अष्टभुजांमध्ये आहे. भारतमातेच्या हातात नांगर- कृषी, पुस्तक- ज्ञान, शंख- प्रबोधन, तलवार-सुरक्षा, सोन्याची नाणी- संपत्ती व आशीर्वाद देणारा हात संस्कृतीचे प्रतीक आहे. एका हातात तिरंगा आहे. इंग्रजांच्या भारतातील आगमनाची माहिती देणारे छायाचित्र मंदिरात आहे. ‘व्यापार करण्यास आले नि राज्यकर्ते झाले’, असा संदेश त्यात आहे. छायाचित्रांच्या माध्यमातून इंग्रजांनी आपल्याला गुलाम कसे बनविले, याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे.१८५७ चे स्वातंत्र्यसमर, झाशीची राणी, दांडी मार्च, सविनय कायदेभंग, ‘भारत- छोडो’ आंदोलन, काकोरी दरोडा, चौरी-चौरा हत्याकांड, जालियनवाला बाग हत्याकांड, आझाद हिंद फौजेच्या स्थापनेचा इतिहास मंदिरात पाहायला मिळतो. परमवीर चक्राने सन्मानित वीर, आतापर्यंतचे पंतप्रधान, भारतीय वैज्ञानिक, नोबेल पुरस्काराने सन्मानित व्यक्तींची छायाचित्रेही मंदिरात मांडण्यात आली आहेत.

टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८