शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नसरिंह राव यांनी केली होती सोनिया गांधींची हेरगिरी, विनय सीतापती यांच्या पुस्तकातून गौप्यस्फोट

By admin | Updated: June 25, 2016 21:49 IST

अयोध्या बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची हेरगिरी करण्याचे आदेश तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी दिले होते असा गौप्यस्फोट विनय सीतापती यांनी केला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 25 - अयोध्या बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची हेरगिरी करण्यात आली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनीच हेरगिरी करण्याचा आदेश दिला होता, असा धक्कादायक खुलासा विनय सीतापती यांनी आपल्या ‘Half-Lion: How P V Narasimha Rao Transformed India’ या पुस्तकात केला आहे. पुस्तकात दिलेली सर्व माहिती नरसिंह राव यांच्या वैयक्तिक दस्ताऐवजांच्या आधारे दिली असल्याचा दावा लेखक विनय सीतापती यांच्यायांनी केला आहे. 
 
अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी सोनिया गांधींची हेरगिरी करण्याचा आदेश दिला होता. नरसिंह राव यांनी आयबीच्या गुप्तहेरांना दिलेल्या या आदेशानंतर सोनिया गांधींच्या 10 जनपथ निवास्थानावर नजर ठेवण्यात आली होती. आपल्याला विरोध करणा-या काँग्रेसच्या नेत्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश नरसिंह राव यांनी सोनिया गांधींच्या घरी तैनात असलेल्या आयबीच्या गुप्तहेरांना दिले होते असाही दावा पुस्तकात करण्यात आला आहे.
आयबीने नरसिंह राव यांनी लेखी अहवाल सादर केला होता. यामध्ये अर्जुन सिंह, दिग्विजय सिंह, अजित जोगी, सलामतुल्ला आणि अहमद पटेल यांची नावे देण्यात आली होती. या सर्व नेत्यांनी अयोध्या प्रकरणावरुन पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याचं अहवालात म्हटलं होतं असंही पुस्तकात सांगण्यात आलं होतं.
नरसिंह राव यांनी त्यानंतरही 1995 साली आयबीमार्फत सोनिया गांधी यांची हेरिगिरी केली होती. यावेळी आपले आणि सोनिया गांधींचे समर्थक यांची माहिती काढण्यात सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आयबीने पुन्हा एकदा अहवाल सादर केला होता असं पुस्तकात सांगण्यात आलं आहे. 
 
नरसिंह राव यांच्या हेरगिरीची माहिती मिळाल्यानंतर सोनिया गांधींनीही पक्षातील एकनिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून नरसिंह राव यांच्यावर नजर ठेवली असल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे.