शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

नशिराबादकरांना महिन्यातून ५ दिवसच मिळते पाणी ! विहिरींची पातळी खोल, नियोजनाच्या अभावामुळे टंचाईची झळ

By admin | Updated: January 14, 2016 23:59 IST

नशिराबाद : संभाव्य पाणी टंचाईचे नियोजन व्हावे, अशी ओरड होत असली तरी ग्रामपंचायतीने याबाबत ठोस पाऊले उचलले नसल्याने आतापासूनच ग्रामस्थांना टंचाईची झळ बसू लागली आहे. त्यातच पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींची पातळी खोल गेल्याने गावाला सध्या ५ ते ६ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे महिनाभरातून फक्त ४ ते ५ दिवसच पाणी मिळत आहे. जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यासाठी पर्यायी योजनेची मागणी होत आहे.

नशिराबाद : संभाव्य पाणी टंचाईचे नियोजन व्हावे, अशी ओरड होत असली तरी ग्रामपंचायतीने याबाबत ठोस पाऊले उचलले नसल्याने आतापासूनच ग्रामस्थांना टंचाईची झळ बसू लागली आहे. त्यातच पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींची पातळी खोल गेल्याने गावाला सध्या ५ ते ६ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे महिनाभरातून फक्त ४ ते ५ दिवसच पाणी मिळत आहे. जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यासाठी पर्यायी योजनेची मागणी होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून येथे पाणी टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत आहे. एप्रिल-मे मध्ये टंचाईची भीषणता वाढत असते. त्यासाठी आतापासूनच संभाव्य पाणी टंचाईचे नियोजन होणे आवश्यक आहे. सुमारे १७ कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजना थंड बस्त्यात सुरू असून यंदाही शुद्ध पाण्यापासून नागरिकांना वंचित रहावे लागणार आहे.
बेळी, पेठ व अन्य जलस्त्रोतातून पाणीपुरवठा गावाला होत आहे. मात्र पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने पाणीपुरवठा करणार्‍या दिवसांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सध्या गावाला ५ ते ६ दिवसाआड पाणी मिळत आहे.
नियोजन कोलमडले
येथे सार्वजनिक नळांना तोट्याच नाहीत. तसेच काही ठिकाणी खाजगी नळांना तोट्या नाहीत, उंटविडी गुदामाजवळ व्हॉल्व्हमधून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. गावात विविध ठिकाणी व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती होत आहे; मात्र याबाबत ग्रामपंचायत सोयीस्कर दुर्लक्ष करीत नियोजनाचा अभाव समोर आणत आहे. पाणी बचतीबाबत उपाययोजना व्हावी ही अपेक्षा आहे. ग्रामस्थांकडून स्पेशल पाणीप˜ीचे वार्षिक आकारणी होऊनही सध्या महिनाभरात ४ ते ५ वेळा कमी दाबाने पाणी मिळत आहे.
अखेर धाव एमआयडीसीकडे?
पाणी टंचाईच्या काळात येथे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत असतो. त्या पाण्यापोटी सुमारे कोट्यवधींची थकबाकीचा बोजा लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नामुळे सुमारे सव्वा कोटीवर आला आहे. पर्यायी योजनाच नसल्याने टंचाई निवारणासाठी अखेर एमआयडीसीच्या पाण्यावर भिस्त असते. जानेवारीपासूनच टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत असल्याने आता धाव एमआयडीसीकडेच असा प्रश्न समोर येत आहे.