शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी चालत नाहीत, झेप घेतात - अमित शाह

By admin | Updated: May 2, 2017 12:55 IST

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्ली महापालिका निवडणुकीत झालेल्या विजयानंतर विजयी उमेदवारांशी संवाद साधतना पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्ली महापालिका निवडणुकीत झालेल्या विजयानंतर विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. सोबतच ज्या नगरसेवकांनी पक्षाचा आदेश मानत निवडणुकीतून माघार घेतली, आणि कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम केलं त्यांनाही शुभेच्छा देत आभार मानले. "दिल्ली महापालिकेतील विजय अंतिम नाही, दिल्लीमध्ये आपलं सरकार आणण्याची ही सुरुवात असल्याचं", अमित शहा यावेळी बोलले आहेत. "महापालिकेला आपलं काम दाखवून दिल्लीत जागा तयार करायची आहे. जनतेने आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवत त्यांच्या अपेक्षा पुर्ण करायच्या आहेत. जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी आपण नम्र असणं गरजेचं आहे", असं अमित शहा बोलले आहेत.
 
2014 पासून जनतेने डोळे झाकून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आहे असं अमित शहा यांनी सांगितलं. तसंच आपण इतक्या सभा घेतल्या, मात्र कोणीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही. आम्ही लोकांना आपलं म्हणणं सांगितलं. लोकांना मोदींवर विश्वास आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला मतदान केलं असल्याचं अमित शहा बोलले आहेत. यावेळी अमित शहा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टोमणा मारत म्हटलं की, "ईव्हीएममुळे आम्ही जिंकलो असा आरोप केजरीवाल करत आहेत, खरं माहिती करुन घ्यायचं असेल तर आमच्या बूथ - इनचार्जला भेटा". 
 
जनतेला बोलणारे पंतप्रधान हवे होते - 
अमित शहा बोलले आहेत की, "जनतेला बोलणारे पंतप्रधान हवे होते. त्यांना पंतप्रधानांना ऐकायचं होतं. दुसरी त्यांची काहीच अपेक्षा नव्हती. पण पंतप्रधान मोदींनी 20-20 तास काम करु देशाला या उंचीवर आणलं आहे. पंतप्रधान मोदी चालत नाही, तर झेप घेतात". 
 
 
"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत येताच हे सरकार गरिब, बेरोजगार, शेतक-यांसाठी समर्पित असल्याचं सांगितलं होतं. देशाचा अभिमान वाढवण्यासाठी त्यांनी हे वचन दिलं होतं. आज तीन वर्षानंतर मोदींनी प्रत्येक मुद्द्यावर काही ना काहीतरी काम केलं आहे. सर्वांना समाधीनी करण्यात त्यांना यश मिळालं आहे. भारताची अर्थव्यवस्था सुधरत असल्याचं तज्ञ सांगत आहेत", असं अमित शहा यांनी सांगितलं.