शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

नरेंद्र मोदी चालत नाहीत, झेप घेतात - अमित शाह

By admin | Updated: May 2, 2017 12:55 IST

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्ली महापालिका निवडणुकीत झालेल्या विजयानंतर विजयी उमेदवारांशी संवाद साधतना पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्ली महापालिका निवडणुकीत झालेल्या विजयानंतर विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. सोबतच ज्या नगरसेवकांनी पक्षाचा आदेश मानत निवडणुकीतून माघार घेतली, आणि कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम केलं त्यांनाही शुभेच्छा देत आभार मानले. "दिल्ली महापालिकेतील विजय अंतिम नाही, दिल्लीमध्ये आपलं सरकार आणण्याची ही सुरुवात असल्याचं", अमित शहा यावेळी बोलले आहेत. "महापालिकेला आपलं काम दाखवून दिल्लीत जागा तयार करायची आहे. जनतेने आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवत त्यांच्या अपेक्षा पुर्ण करायच्या आहेत. जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी आपण नम्र असणं गरजेचं आहे", असं अमित शहा बोलले आहेत.
 
2014 पासून जनतेने डोळे झाकून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आहे असं अमित शहा यांनी सांगितलं. तसंच आपण इतक्या सभा घेतल्या, मात्र कोणीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही. आम्ही लोकांना आपलं म्हणणं सांगितलं. लोकांना मोदींवर विश्वास आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला मतदान केलं असल्याचं अमित शहा बोलले आहेत. यावेळी अमित शहा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टोमणा मारत म्हटलं की, "ईव्हीएममुळे आम्ही जिंकलो असा आरोप केजरीवाल करत आहेत, खरं माहिती करुन घ्यायचं असेल तर आमच्या बूथ - इनचार्जला भेटा". 
 
जनतेला बोलणारे पंतप्रधान हवे होते - 
अमित शहा बोलले आहेत की, "जनतेला बोलणारे पंतप्रधान हवे होते. त्यांना पंतप्रधानांना ऐकायचं होतं. दुसरी त्यांची काहीच अपेक्षा नव्हती. पण पंतप्रधान मोदींनी 20-20 तास काम करु देशाला या उंचीवर आणलं आहे. पंतप्रधान मोदी चालत नाही, तर झेप घेतात". 
 
 
"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत येताच हे सरकार गरिब, बेरोजगार, शेतक-यांसाठी समर्पित असल्याचं सांगितलं होतं. देशाचा अभिमान वाढवण्यासाठी त्यांनी हे वचन दिलं होतं. आज तीन वर्षानंतर मोदींनी प्रत्येक मुद्द्यावर काही ना काहीतरी काम केलं आहे. सर्वांना समाधीनी करण्यात त्यांना यश मिळालं आहे. भारताची अर्थव्यवस्था सुधरत असल्याचं तज्ञ सांगत आहेत", असं अमित शहा यांनी सांगितलं.