शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

नरेंद्र मोदी बनलेत'NRI, त्यांना बनवा 'जगाचे पंतप्रधान' - लालूप्रसाद यादव

By admin | Updated: June 13, 2016 09:00 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे NRI(अनिवासी भारतीय) बनले असून त्यांच्यासाठी जगाचे पंतप्रधान असे पद तयार करावे, अशी टीका लालू यादवांनी केली

ऑनलाइन लोकमत
रांची, दि. १३ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौ-यावरून विरोधकांनी नेहमीच त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात मोदींनी अनेक देशांचे दौरे केले आहेत, त्यावरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरले. आता यामध्ये राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांची भर पडली आहे. लालू यांनी पंतप्रधानांच्या विदेश दौ-यांच्या पार्श्वभूमीवर 'मोदी हे NRI (अनिवासी भारतीय) बनले आहेत' अशी टीका केली असून पंतप्रदान मोदींसाठी 'जगाचे पंतप्रधान' असे पद तयार करावे असे अपीलही जगभरातील नेत्यांसमोर केले आहे. 
चारा घोटाळ्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी लालू यादव रांची येथे आले असून तेथेच त्यांनी पंतप्रधान मोदींवर आपल्या खास शैलीत टीका केली. ' मोदी या देशाचे (भारत) पंतप्रधान आहेत, मात्र सर्वाधिक काळ ते देशाबाहेरच (विदेश दौ-यांमुळे) असतात. मोदींसाठी जगाचे पंतप्रधान असे पद तयार करावे, असे अपील मी जगभरातील नेत्यांना करू इच्छितो' असे ते म्हणाले. 
(नरेंद्र मोदी हे कलयुगातील कालिया नाग - लालूप्रसाद यादव)
  •  
 
यापूर्वीही लालू यादव यांनी मोदींवर अनेक वेळा टीका केली होती.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने कालिया नागाने कलयुगात पुर्नजन्म घेतला असून आम्ही कृष्णाप्रमाणेच या नागाला बिहारमधून पळवून लावू अशा तिखट शब्दांत त्यांनी मोदींवर हल्ला चढवला होता. 

चारा घोटाळा अर्थात चाईबासा कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांवा शिक्षा सुनावण्यात आली होती. कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याच्या चारा घोटाळ्याच्या एका प्रकरणात सीबीआयच्या दुसऱ्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद व अन्य आरोपींना चाईबासाप्रकरणी २०१४मध्ये शिक्षा ठोठावली होती़, तूर्तास ते जामिनावर आहेत़.