शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

नजनपाटील यांची पावणे दोन वर्षात तीन वेळा बदली गौडबंगाल : आता किरकोळ रजेवर की सक्तीच्या; चर्चेला उधाण

By admin | Updated: July 16, 2016 00:38 IST

जळगाव : चोपड्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांची पावणे दोन वर्षाच्या काळात तीन वेळा बदली झाली आहे. एका पोलीस स्टेशनला नेमणूक झाल्यानंतर नियमानुसार दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर बदली होणे अपेक्षित असते. नजनपाटील मात्र, या नियमावलीला अपवाद ठरले आहेत. दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची वेगवेगळ्या कारणाने तीन वेळा उचलबांगडी झाली आहे.

जळगाव : चोपड्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांची पावणे दोन वर्षाच्या काळात तीन वेळा बदली झाली आहे. एका पोलीस स्टेशनला नेमणूक झाल्यानंतर नियमानुसार दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर बदली होणे अपेक्षित असते. नजनपाटील मात्र, या नियमावलीला अपवाद ठरले आहेत. दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची वेगवेगळ्या कारणाने तीन वेळा उचलबांगडी झाली आहे.
जळगाव शहर पोलीस स्टेशनला १९ ऑगस्ट २०१४ रोजी नजनपाटील यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर अवघ्या दहा महिन्यात त्यांची उचलबांगडी झाली. १५ जून २०१५ रोजी त्यांना भुसावळ बाजारपेठला पाठविण्यात आले. शहर पोलीस स्टेशनला शिवसेनेचे गजानन मालपुरे यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर हा वाद न्यायालयात पोहचला होता. म्हणून १६ जून २०१५ रोजी नजनपाटील यांना भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले होते. भुसावळची कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे कारण सांगत तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी आपल्याला भुसावळला पाठविले होते, असा दावा नजनपाटील यांनी तेव्हा केला होता. नंतर भुसावळहूनही त्यांची दहाच महिन्यात नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. आमदार संजय सावकारे यांचे समर्थक पिंटू कोठारी यांच्यावर झालेल्या कारवाईतून सावकारे व नजनपाटील यांच्यात दरी निर्माण झाली होती. त्यातूनच त्यांची भुसावळहून उचलबांगडी झाल्याचे बोलले जात होते. तर तत्कालीन पालकमंत्री खडसेंच्या मर्जीतील पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्यासाठी नजनपाटील यांना हटविण्यात आल्याची तेव्हा चर्चा होती.
भाजपा कार्यकर्त्यांमुळे आले अडचणीत
काही दिवस नियंत्रण कक्षात काम केल्यानंतर ३० मे २०१६ रोजी नजनपाटील यांची चोपडा शहर पोलीस स्टेशनला नेमणूक करण्यात आली. तेथे १३ जून रोजी गायींचा ट्रक पकडल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ट्रक जाळला होता. त्या वादातून भाजपा कार्यकर्त्यांशी नजनपाटील यांचे बिनसले. म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे त्यांच्या तक्रारी केल्या. त्यानंतर ते रजेवर गेले आहेत.