शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

नजनपाटील यांची पावणे दोन वर्षात तीन वेळा बदली गौडबंगाल : आता किरकोळ रजेवर की सक्तीच्या; चर्चेला उधाण

By admin | Updated: July 16, 2016 00:38 IST

जळगाव : चोपड्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांची पावणे दोन वर्षाच्या काळात तीन वेळा बदली झाली आहे. एका पोलीस स्टेशनला नेमणूक झाल्यानंतर नियमानुसार दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर बदली होणे अपेक्षित असते. नजनपाटील मात्र, या नियमावलीला अपवाद ठरले आहेत. दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची वेगवेगळ्या कारणाने तीन वेळा उचलबांगडी झाली आहे.

जळगाव : चोपड्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांची पावणे दोन वर्षाच्या काळात तीन वेळा बदली झाली आहे. एका पोलीस स्टेशनला नेमणूक झाल्यानंतर नियमानुसार दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर बदली होणे अपेक्षित असते. नजनपाटील मात्र, या नियमावलीला अपवाद ठरले आहेत. दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची वेगवेगळ्या कारणाने तीन वेळा उचलबांगडी झाली आहे.
जळगाव शहर पोलीस स्टेशनला १९ ऑगस्ट २०१४ रोजी नजनपाटील यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर अवघ्या दहा महिन्यात त्यांची उचलबांगडी झाली. १५ जून २०१५ रोजी त्यांना भुसावळ बाजारपेठला पाठविण्यात आले. शहर पोलीस स्टेशनला शिवसेनेचे गजानन मालपुरे यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर हा वाद न्यायालयात पोहचला होता. म्हणून १६ जून २०१५ रोजी नजनपाटील यांना भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले होते. भुसावळची कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे कारण सांगत तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी आपल्याला भुसावळला पाठविले होते, असा दावा नजनपाटील यांनी तेव्हा केला होता. नंतर भुसावळहूनही त्यांची दहाच महिन्यात नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. आमदार संजय सावकारे यांचे समर्थक पिंटू कोठारी यांच्यावर झालेल्या कारवाईतून सावकारे व नजनपाटील यांच्यात दरी निर्माण झाली होती. त्यातूनच त्यांची भुसावळहून उचलबांगडी झाल्याचे बोलले जात होते. तर तत्कालीन पालकमंत्री खडसेंच्या मर्जीतील पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्यासाठी नजनपाटील यांना हटविण्यात आल्याची तेव्हा चर्चा होती.
भाजपा कार्यकर्त्यांमुळे आले अडचणीत
काही दिवस नियंत्रण कक्षात काम केल्यानंतर ३० मे २०१६ रोजी नजनपाटील यांची चोपडा शहर पोलीस स्टेशनला नेमणूक करण्यात आली. तेथे १३ जून रोजी गायींचा ट्रक पकडल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ट्रक जाळला होता. त्या वादातून भाजपा कार्यकर्त्यांशी नजनपाटील यांचे बिनसले. म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे त्यांच्या तक्रारी केल्या. त्यानंतर ते रजेवर गेले आहेत.