शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

एनडीटीव्हीवरील बंदीचे नायडू यांनी केले समर्थन

By admin | Updated: November 6, 2016 09:08 IST

एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर घालण्यात आलेल्या एक दिवसाच्या बंदीचा सर्वत्र निषेध होत असताना आणि हा प्रकार म्हणजे माध्यम स्वातंत्र्यावर आघात आहे

चेन्नई - एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर घालण्यात आलेल्या एक दिवसाच्या बंदीचा सर्वत्र निषेध होत असताना आणि हा प्रकार म्हणजे माध्यम स्वातंत्र्यावर आघात आहे, अशी टीका होत असली त्यांचा केंद्र सरकारवर काहीही परिणाम झालेला नाही. किंबहुना माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बंदीचे जोरदार समर्थन केले आहे. देशाची सुरक्षा लक्षात घेऊनच या वृत्त वाहिनीवर बंदी घालण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.एनडीटीव्हीवर बंदी घालून सरकार मागच्या दाराने आणीबाणी लादीत असून प्रसार माध्यमांना धमकावण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर येथे आयोजित पत्रकार परिषदेत नायडू म्हणाले की, रालोआ सरकारला माध्यमांच्या स्वातंत्र्याचा सर्वोच्च आदर आहे. अशा मुद्यांचे राजकारण केल्यास देशाच्या सुरक्षेवरच परिणाम होऊ शकतो. काही लोक देशात आणीबाणी सारखी स्थिती असल्याचा आरोप करीत आहेत. मला त्याचे आश्चर्य वाटते. वृत्तवाहिनीवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे, असल्याचे आज मी वृत्तपत्रात वाचले. हे लोक असे कसे काय म्हणत आहेत. यापूर्वी वाहिन्यांवर किती वेळा बंदी घालण्यात आली, याची यादी मी देऊ का? एएक्सएनवर दोन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. एफटीव्हीवरही दोन महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. याशिवाय एन्टर १0 वाहिनीवर एक दिवसाची, एबीएन आंध्रज्योतीवर सात दिवस, अल जझिरावर पाच दिवसांची बंदी घालण्यात आली होती. नायडू म्हणाले की, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणीबाणीच्या काळ््या दिवसांबाबत बोलत आहेत. आणीबाणी काय आहे, हे तरी तुम्हाला माहिती आहे का? आज टीका करणारे देशात आणीबाणी लादली होती, तेव्हा काँग्रेसमध्ये होते. सरकारवर तसेच पंतप्रधानांवर टीका करण्यासाठी हे लोक संधीच शोधत असतात. (वृत्तसंस्था) >बंदी आणीबाणीकडे नेईलएनडीटीव्हीवरील बंदी देशाला दुसऱ्या आणीबाणीच्या दिशेने घेऊन जाईल, अशी टीका द्रमुक नेते एम. करुणानिधी यांनी केली. पक्षाचे मुखपत्र ‘मुरासोली’मध्ये लिहिलेल्या एका लेखात ९३ वर्षीय करुणानिधी यांनी म्हटले की, या बंदीने मला आणीबाणीची आठवण झाली आहे. केंद्र सरकार अशाच कारवाया करीत राहिले तर देशात पुन्हा आणीबाणी येईल.