शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांसाठी भारतापेक्षा योग्य देश नाही - भाजपाने आमिरला सुनावले

By admin | Updated: November 24, 2015 15:13 IST

मुस्लिमांसाठी अतुल्य भारतापेक्षा इतर कोणताही देश योग्य नाही आणि हिंदूपेक्षा चांगला शेजारी नाही, असे भाजपा प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी म्हटले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - देशातील असहिष्णू घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत सोडून जाण्याचे वक्तव्य करणा-या अभिनेता आमिर खानवर चहुबाजूंनी टीका होत असून भारतीय जनता पक्षानेही आमिरच्या वक्तव्याची निंदा केली आहे. 'मुस्लिमांसाठी अतुल्य भारतापेक्षा इतर कोणताही देश योग्य नाही' असे सांगत भाजपा प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी आमिरला खडसावले. पत्रकार परिषदेत बोलताना ' याच देशाने तुला स्टार बनवले हे विसरू नकोस' असे खडे बोल हुसैन यांनी सुनावले.  तसेच आमिरच्या वक्तव्याने देशाची प्रतिमा डागाळली अशी टीकाही करण्यात येत आहे.
देशातील असहिष्णूतेविरोधात वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण देश सोडण्याचा विचार करूया असे पत्नी किरणने सुचवल्याचे आमिरने काल एका कार्यक्रमात म्हटले होते. त्यानंतर चहुबाजूंनी त्याच्यावर टीकेचा भडिमार झाला. बॉलिवूडमधील अनेक कलावंत तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आमिरवर हल्ला चढवत त्याच्या वक्तव्याचा निषेध केला, मात्र आमिरचे वक्तव्य म्हणजे लाखो लोकांच्या मनातील भावनाच असल्याचे सांगत भाजपाच्या विरोधकांनी ही संधी साधून सरकारवर टीका केली. सरकार व मोदीजींना प्रश्न विचारणाऱ्यांना देशविरोधी म्हणण्यापेक्षा सरकारने हे जाणून घेतलं पाहिजे की त्यांच्यासाठी कोणती गोष्ट त्रासदायक ठरत आहे, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सरकारवर हल्ला चढवला व आमिरला पाठिंबा दर्शवला.
मात्र भाजपाने या सर्वांना प्रत्युत्तर देत भारत असहिष्णू नसल्याचे स्पष्ट केले. ' आमिर खानला भारतापेक्षा योग्य देश सापडणार नाही. भारत हा असा एकमेव देश आहे जो कलावंतांचा धर्म पाहत नाही, जर तू (आमिर) भारत सोडून कुठेही गेलास तर तुला तिथे फक्त असहिष्णूताच दिसेल असे हुसैन म्हणाले. 
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीनी आमिरला दिलेल्या पाठिंब्यासंदर्भात बोलताना हुसैन म्हणाले 'शेकडो दंगली व हजारोंच्या लोकांच्या हत्येचा दाग असलेल्या काँग्रेसने भारताला सहिष्णूता शिकवायची गरज नाही.
 
शिवसेनेचीही आमिरवर सडकून टीका
दरम्यान शिवसेनेनेही आमिर खानवर सडकून टीका केली आहे. आम्ही इतके दिवस सापाला दूध पाजत होतो, आमिरला देश सोडायचा असेल तर त्याने पाकिस्तानात जावे, अशा शब्दांत शिवसेनेच्या रामदास कदम यांनी आमिरवर हल्ला चढवला. 
दरम्यान कालच्या वक्तव्यानंतर आज आमिरविरोधात दिल्लीतील अशोकनगर पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आमिरच्या मुंबईतील घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.