शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मुस्लिमांसाठी भारतापेक्षा योग्य देश नाही - भाजपाने आमिरला सुनावले

By admin | Updated: November 24, 2015 15:13 IST

मुस्लिमांसाठी अतुल्य भारतापेक्षा इतर कोणताही देश योग्य नाही आणि हिंदूपेक्षा चांगला शेजारी नाही, असे भाजपा प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी म्हटले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - देशातील असहिष्णू घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत सोडून जाण्याचे वक्तव्य करणा-या अभिनेता आमिर खानवर चहुबाजूंनी टीका होत असून भारतीय जनता पक्षानेही आमिरच्या वक्तव्याची निंदा केली आहे. 'मुस्लिमांसाठी अतुल्य भारतापेक्षा इतर कोणताही देश योग्य नाही' असे सांगत भाजपा प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी आमिरला खडसावले. पत्रकार परिषदेत बोलताना ' याच देशाने तुला स्टार बनवले हे विसरू नकोस' असे खडे बोल हुसैन यांनी सुनावले.  तसेच आमिरच्या वक्तव्याने देशाची प्रतिमा डागाळली अशी टीकाही करण्यात येत आहे.
देशातील असहिष्णूतेविरोधात वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण देश सोडण्याचा विचार करूया असे पत्नी किरणने सुचवल्याचे आमिरने काल एका कार्यक्रमात म्हटले होते. त्यानंतर चहुबाजूंनी त्याच्यावर टीकेचा भडिमार झाला. बॉलिवूडमधील अनेक कलावंत तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आमिरवर हल्ला चढवत त्याच्या वक्तव्याचा निषेध केला, मात्र आमिरचे वक्तव्य म्हणजे लाखो लोकांच्या मनातील भावनाच असल्याचे सांगत भाजपाच्या विरोधकांनी ही संधी साधून सरकारवर टीका केली. सरकार व मोदीजींना प्रश्न विचारणाऱ्यांना देशविरोधी म्हणण्यापेक्षा सरकारने हे जाणून घेतलं पाहिजे की त्यांच्यासाठी कोणती गोष्ट त्रासदायक ठरत आहे, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सरकारवर हल्ला चढवला व आमिरला पाठिंबा दर्शवला.
मात्र भाजपाने या सर्वांना प्रत्युत्तर देत भारत असहिष्णू नसल्याचे स्पष्ट केले. ' आमिर खानला भारतापेक्षा योग्य देश सापडणार नाही. भारत हा असा एकमेव देश आहे जो कलावंतांचा धर्म पाहत नाही, जर तू (आमिर) भारत सोडून कुठेही गेलास तर तुला तिथे फक्त असहिष्णूताच दिसेल असे हुसैन म्हणाले. 
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीनी आमिरला दिलेल्या पाठिंब्यासंदर्भात बोलताना हुसैन म्हणाले 'शेकडो दंगली व हजारोंच्या लोकांच्या हत्येचा दाग असलेल्या काँग्रेसने भारताला सहिष्णूता शिकवायची गरज नाही.
 
शिवसेनेचीही आमिरवर सडकून टीका
दरम्यान शिवसेनेनेही आमिर खानवर सडकून टीका केली आहे. आम्ही इतके दिवस सापाला दूध पाजत होतो, आमिरला देश सोडायचा असेल तर त्याने पाकिस्तानात जावे, अशा शब्दांत शिवसेनेच्या रामदास कदम यांनी आमिरवर हल्ला चढवला. 
दरम्यान कालच्या वक्तव्यानंतर आज आमिरविरोधात दिल्लीतील अशोकनगर पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आमिरच्या मुंबईतील घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.