शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

दहशतवादापेक्षा प्रेमाचे बळी अधिक

By admin | Updated: April 3, 2017 04:58 IST

सैराट चित्रपटात एकमेकांवर प्रेम करणाऱ्या आर्ची आणि परशाचा कसा बळी घेण्यात आला

नवी दिल्ली : सैराट चित्रपटात एकमेकांवर प्रेम करणाऱ्या आर्ची आणि परशाचा कसा बळी घेण्यात आला, हे सर्र्वाना माहीत असेल. चित्रपटांत अशी दृश्ये अनेकदा पाहायला मिळतात. पण भारतामध्ये दहशतवादापेक्षा प्रेमप्रकरणांमुळे बळी पडणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचे आकडेवारीतून उघड झाले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार २00१ ते २0१५ या १५ वर्षांमध्ये भारतात प्रेमप्रकरणांनी ३८ हजार ५८५ जणांचा बळी घेतला. देशात प्रेमप्रकरणातून दररोज ७ हत्या होतात, १४ जण आत्महत्या करतात आणि अपहरणाचे ४७ प्रकार घडतात. ही अपहरणे अर्थातच मुलींची असतात. सतत दहशतवादाच्या छायेत असलेल्या भारतात दरवर्षी शेकडो नागरिक मृत्युमुखी पडत असतात. पण प्रेमप्रकरणातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण त्याच्या सहापट आहे. प्रकाशित झालेल्या वृतानुसार २00१ ते २0१५ या काळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये २0 हजार भारतीय मरण पावले.देशात गेल्या १५ वर्षांमध्ये २ लाख ६0 हजार अपहरणाचे गुन्हे दाखल झाले. त्यातील तरुण मुली, अल्पवयीन मुली आणि महिला यांचे अपहरण प्रामुख्याने विवाहाच्या कारणास्तव झाले होते. प्रेमप्रकरणामधून होणाऱ्या आत्महत्यांमध्ये पश्चिम बंगाल हे राज्य सर्वांत पुढे आहे. तिथे गेल्या १५ वर्षांत १५ हजार जणांनी आत्महत्या केल्या. म्हणजे दरवर्षी सरासरी एक हजार जणांनी आत्महत्या केल्या, असे दिसते. (लोकमत न्यूज नेटवर्क) आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू व मध्य प्रदेश या पाच राज्यांत प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्यांचे प्रमाण अधिक आहे. या राज्यांमध्ये गेल्या १५ वर्षांत ३ हजारांहून अधिक हत्या झाल्या.