शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

दहशतवादापेक्षा प्रेमाचे बळी अधिक

By admin | Updated: April 3, 2017 04:58 IST

सैराट चित्रपटात एकमेकांवर प्रेम करणाऱ्या आर्ची आणि परशाचा कसा बळी घेण्यात आला

नवी दिल्ली : सैराट चित्रपटात एकमेकांवर प्रेम करणाऱ्या आर्ची आणि परशाचा कसा बळी घेण्यात आला, हे सर्र्वाना माहीत असेल. चित्रपटांत अशी दृश्ये अनेकदा पाहायला मिळतात. पण भारतामध्ये दहशतवादापेक्षा प्रेमप्रकरणांमुळे बळी पडणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचे आकडेवारीतून उघड झाले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार २00१ ते २0१५ या १५ वर्षांमध्ये भारतात प्रेमप्रकरणांनी ३८ हजार ५८५ जणांचा बळी घेतला. देशात प्रेमप्रकरणातून दररोज ७ हत्या होतात, १४ जण आत्महत्या करतात आणि अपहरणाचे ४७ प्रकार घडतात. ही अपहरणे अर्थातच मुलींची असतात. सतत दहशतवादाच्या छायेत असलेल्या भारतात दरवर्षी शेकडो नागरिक मृत्युमुखी पडत असतात. पण प्रेमप्रकरणातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण त्याच्या सहापट आहे. प्रकाशित झालेल्या वृतानुसार २00१ ते २0१५ या काळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये २0 हजार भारतीय मरण पावले.देशात गेल्या १५ वर्षांमध्ये २ लाख ६0 हजार अपहरणाचे गुन्हे दाखल झाले. त्यातील तरुण मुली, अल्पवयीन मुली आणि महिला यांचे अपहरण प्रामुख्याने विवाहाच्या कारणास्तव झाले होते. प्रेमप्रकरणामधून होणाऱ्या आत्महत्यांमध्ये पश्चिम बंगाल हे राज्य सर्वांत पुढे आहे. तिथे गेल्या १५ वर्षांत १५ हजार जणांनी आत्महत्या केल्या. म्हणजे दरवर्षी सरासरी एक हजार जणांनी आत्महत्या केल्या, असे दिसते. (लोकमत न्यूज नेटवर्क) आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू व मध्य प्रदेश या पाच राज्यांत प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्यांचे प्रमाण अधिक आहे. या राज्यांमध्ये गेल्या १५ वर्षांत ३ हजारांहून अधिक हत्या झाल्या.