शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

दहशतवादापेक्षा प्रेमाचे बळी अधिक

By admin | Updated: April 3, 2017 04:58 IST

सैराट चित्रपटात एकमेकांवर प्रेम करणाऱ्या आर्ची आणि परशाचा कसा बळी घेण्यात आला

नवी दिल्ली : सैराट चित्रपटात एकमेकांवर प्रेम करणाऱ्या आर्ची आणि परशाचा कसा बळी घेण्यात आला, हे सर्र्वाना माहीत असेल. चित्रपटांत अशी दृश्ये अनेकदा पाहायला मिळतात. पण भारतामध्ये दहशतवादापेक्षा प्रेमप्रकरणांमुळे बळी पडणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचे आकडेवारीतून उघड झाले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार २00१ ते २0१५ या १५ वर्षांमध्ये भारतात प्रेमप्रकरणांनी ३८ हजार ५८५ जणांचा बळी घेतला. देशात प्रेमप्रकरणातून दररोज ७ हत्या होतात, १४ जण आत्महत्या करतात आणि अपहरणाचे ४७ प्रकार घडतात. ही अपहरणे अर्थातच मुलींची असतात. सतत दहशतवादाच्या छायेत असलेल्या भारतात दरवर्षी शेकडो नागरिक मृत्युमुखी पडत असतात. पण प्रेमप्रकरणातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण त्याच्या सहापट आहे. प्रकाशित झालेल्या वृतानुसार २00१ ते २0१५ या काळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये २0 हजार भारतीय मरण पावले.देशात गेल्या १५ वर्षांमध्ये २ लाख ६0 हजार अपहरणाचे गुन्हे दाखल झाले. त्यातील तरुण मुली, अल्पवयीन मुली आणि महिला यांचे अपहरण प्रामुख्याने विवाहाच्या कारणास्तव झाले होते. प्रेमप्रकरणामधून होणाऱ्या आत्महत्यांमध्ये पश्चिम बंगाल हे राज्य सर्वांत पुढे आहे. तिथे गेल्या १५ वर्षांत १५ हजार जणांनी आत्महत्या केल्या. म्हणजे दरवर्षी सरासरी एक हजार जणांनी आत्महत्या केल्या, असे दिसते. (लोकमत न्यूज नेटवर्क) आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू व मध्य प्रदेश या पाच राज्यांत प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्यांचे प्रमाण अधिक आहे. या राज्यांमध्ये गेल्या १५ वर्षांत ३ हजारांहून अधिक हत्या झाल्या.