शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादापेक्षा प्रेमाचे बळी अधिक

By admin | Updated: April 3, 2017 04:58 IST

सैराट चित्रपटात एकमेकांवर प्रेम करणाऱ्या आर्ची आणि परशाचा कसा बळी घेण्यात आला

नवी दिल्ली : सैराट चित्रपटात एकमेकांवर प्रेम करणाऱ्या आर्ची आणि परशाचा कसा बळी घेण्यात आला, हे सर्र्वाना माहीत असेल. चित्रपटांत अशी दृश्ये अनेकदा पाहायला मिळतात. पण भारतामध्ये दहशतवादापेक्षा प्रेमप्रकरणांमुळे बळी पडणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचे आकडेवारीतून उघड झाले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार २00१ ते २0१५ या १५ वर्षांमध्ये भारतात प्रेमप्रकरणांनी ३८ हजार ५८५ जणांचा बळी घेतला. देशात प्रेमप्रकरणातून दररोज ७ हत्या होतात, १४ जण आत्महत्या करतात आणि अपहरणाचे ४७ प्रकार घडतात. ही अपहरणे अर्थातच मुलींची असतात. सतत दहशतवादाच्या छायेत असलेल्या भारतात दरवर्षी शेकडो नागरिक मृत्युमुखी पडत असतात. पण प्रेमप्रकरणातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण त्याच्या सहापट आहे. प्रकाशित झालेल्या वृतानुसार २00१ ते २0१५ या काळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये २0 हजार भारतीय मरण पावले.देशात गेल्या १५ वर्षांमध्ये २ लाख ६0 हजार अपहरणाचे गुन्हे दाखल झाले. त्यातील तरुण मुली, अल्पवयीन मुली आणि महिला यांचे अपहरण प्रामुख्याने विवाहाच्या कारणास्तव झाले होते. प्रेमप्रकरणामधून होणाऱ्या आत्महत्यांमध्ये पश्चिम बंगाल हे राज्य सर्वांत पुढे आहे. तिथे गेल्या १५ वर्षांत १५ हजार जणांनी आत्महत्या केल्या. म्हणजे दरवर्षी सरासरी एक हजार जणांनी आत्महत्या केल्या, असे दिसते. (लोकमत न्यूज नेटवर्क) आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू व मध्य प्रदेश या पाच राज्यांत प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्यांचे प्रमाण अधिक आहे. या राज्यांमध्ये गेल्या १५ वर्षांत ३ हजारांहून अधिक हत्या झाल्या.