शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

वीस लाखाहून अधिक नवे मतदार

By admin | Updated: September 5, 2014 01:43 IST

महाराष्ट्रात मतदार याद्या सुधारण्यासाठी घेतलेल्या विशेष मोहिमेत 2क् लाखांहून अधिक मतदारांनी नावे नोंदवली आहेत.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात मतदार याद्या सुधारण्यासाठी  घेतलेल्या विशेष मोहिमेत 2क् लाखांहून अधिक मतदारांनी नावे नोंदवली आहेत. त्यात मुंबईतील 1.94 लाख तर पुण्यातील 2.66 लाख मतदारांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान मुंबई व पुण्यात अनेक मतदारांची नावे गहाळ असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावरून बराच वाद झाला होता. या पाश्र्वभूमीवर ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती.
मुंबई, ठाणो आणि पुणो येथील ज्या नागरिकांची नावे मतदार यादीतून गहाळ झाली होती, अशा 26 लाख लोकांना केंद्रीय निवडणूक आयोगाने फॉर्म सह पत्र स्पीड पोस्टने पाठविली होती. त्यापैकी 4.5 लाख पत्रे संबंधित व्यक्तींर्पयत पोहोचली. तर, पत्ता चुकीचा असल्याने वा संबंधित व्यक्ती तेथे राहत नसल्याने उर्वरित सर्व पत्रे आयोगाकडे परत आली. नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांमध्ये मुंबईतील 16 हजार 614 आणि पुण्यातील 27 हजार 542 मतदार असे आहेत, ज्यांची नावे पूर्वी याद्यांमध्ये होती, पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी ती गायब झाली होती, असे आयोगाने म्हटले आहे. ज्यांची नावे अजूनही मतदारयादीत नाहीत, अशांना राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेपासून 1क् दिवस आधी नाव नोंदविता येईल. 31 ऑगस्टर्पयत 1.32 लाख नवे अर्ज सादर झाले असून मतदार यादीत सुधारणा करण्याचे काम अद्याप सुरू आहे. 
16 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर निवडणूक आयोगाने 9 ते 3क् जूनदरम्यान मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेतली होती. मतदार यादीतून नाव गहाळ झाले असले तरी, निवडणूक ओळखपत्र आहे, अशांना विशेष सवलत देण्यात आली होती. (विशेष प्रतिनिधी)
 
मोठी जाहिरात, उदंड प्रतिसाद
तब्बल 256 वृत्तपत्रे तसेच रेडिओ आणि दूरदर्शन तसेच खासगी वाहिन्यांवर जाहिरात देण्यात आली तसेच सिनेअभिनेता आमीर खान हाही यात सहभागी झाला होता. त्यामुळेच या विशेष मतदार नोंदणीस उदंड प्रतिसाद मिळाला, असे निवडणूक आयोगाने नमूद केले.