शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

मुंबई हल्ल्यांच्या तुलनेत अधिक कुुशल प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 00:34 IST

पठाणकोट हल्ल्यातील अतिरेक्यांना मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यापेक्षाही अधिक कुशल प्रशिक्षण देण्यात आले असावे.

नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्यातील अतिरेक्यांना मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यापेक्षाही अधिक कुशल प्रशिक्षण देण्यात आले असावे. प्रशिक्षित लष्कराने त्यांना प्रशिक्षण दिले असावे हे त्यांच्या हल्ल्याच्या तंत्रावरून स्पष्ट होते. अतिरेक्यांनी मुरलेल्या लढवय्यांप्रमाणे तंत्र वापरत अधूनमधून चकमक सुरू ठेवण्यावर भर देताना आपल्याकडील दारूगोळ्याचा साठा राखून ठेवला होता. हल्ल्यासाठी त्यांनी पहाटे ३ वाजतादरम्यान सुरक्षेचा स्तर सर्वात कमी असतानाची वेळ निवडली. सर्व हल्लेखोर मारले गेले असा संभ्रमही त्यांनी निर्माण केला. हे सर्व तंत्र पाहता त्यांना लष्कराकडून प्रशिक्षण मिळाल्याचे संकेत मिळतात. लगतच्याच गुलपूर संबोली मार्गावर अतिरेक्यांनी टोयोटा इनोव्हाचा चालक इकदारसिंग याचे वाहन पळवत त्याची हत्या केली. हे स्थळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर आहे.बीएसएफला अहवाल मागितला...पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) सुरक्षेचा भंग झाल्याबद्दल अहवाल सादर करण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे. सशस्त्र अतिरेक्यांना भारतीय हद्दीत प्रवेश कसा शक्य झाला याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा भेदण्याच्या विविध घटना उघडकीस आल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)