शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई हल्ल्यांच्या तुलनेत अधिक कुुशल प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 00:34 IST

पठाणकोट हल्ल्यातील अतिरेक्यांना मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यापेक्षाही अधिक कुशल प्रशिक्षण देण्यात आले असावे.

नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्यातील अतिरेक्यांना मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यापेक्षाही अधिक कुशल प्रशिक्षण देण्यात आले असावे. प्रशिक्षित लष्कराने त्यांना प्रशिक्षण दिले असावे हे त्यांच्या हल्ल्याच्या तंत्रावरून स्पष्ट होते. अतिरेक्यांनी मुरलेल्या लढवय्यांप्रमाणे तंत्र वापरत अधूनमधून चकमक सुरू ठेवण्यावर भर देताना आपल्याकडील दारूगोळ्याचा साठा राखून ठेवला होता. हल्ल्यासाठी त्यांनी पहाटे ३ वाजतादरम्यान सुरक्षेचा स्तर सर्वात कमी असतानाची वेळ निवडली. सर्व हल्लेखोर मारले गेले असा संभ्रमही त्यांनी निर्माण केला. हे सर्व तंत्र पाहता त्यांना लष्कराकडून प्रशिक्षण मिळाल्याचे संकेत मिळतात. लगतच्याच गुलपूर संबोली मार्गावर अतिरेक्यांनी टोयोटा इनोव्हाचा चालक इकदारसिंग याचे वाहन पळवत त्याची हत्या केली. हे स्थळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर आहे.बीएसएफला अहवाल मागितला...पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) सुरक्षेचा भंग झाल्याबद्दल अहवाल सादर करण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे. सशस्त्र अतिरेक्यांना भारतीय हद्दीत प्रवेश कसा शक्य झाला याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा भेदण्याच्या विविध घटना उघडकीस आल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)