शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
5
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
6
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
7
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
8
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
9
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
10
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
11
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
12
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
13
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
14
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
15
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
16
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
17
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
18
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
19
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
20
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या

भारतात दरदिवशी ५० पेक्षा जास्त मुलांचा कर्करोगाने मृत्यू

By admin | Updated: April 24, 2016 08:56 IST

भारतात दरदिवशी ५० पेक्षा जास्त मुलांचा कर्करोगाने मृत्यू होतो. ही मुले एक महिना ते १४ वर्ष वयोगटातील आहेत.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २४ - भारतात दरदिवशी ५० पेक्षा जास्त मुलांचा कर्करोगाने मृत्यू होतो. ही मुले एक महिना ते १४ वर्ष वयोगटातील आहेत. ग्लोबल ऑनकोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
 
कर्करोगाच्या उपाचाराचा महागडा खर्च आणि अत्याधुनिक उपचारांचा अभाव यामुळे कर्करोगाने भारतात लहान मुले दगावण्याचे प्रमाण जास्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विकसित देशांमध्ये कर्करोगांच्या उपचारांमध्ये प्रगती झाल्यामुळे तिथे ८० टक्क्यापेक्षा जास्त मुले कर्करोगामधून बरी होतात असे या अहवालात म्हटले आहे. 
 
आंतरराष्ट्रीय संस्थांमधील संशोधकांनी अभ्यास करुन हा अहवाल तयार केला आहे. यामध्ये टोरांटो विद्यापीठ, मुंबईचे टाटा मेमोरीयल सेंटरचा सहभाग होता. कर्करोग भारतात वेगाने फोफावत असून, लॅनसेटच्या २०१४ च्या अहवालानुसार भारतात दरवर्षी १० लाखापेक्षा जास्त कर्करोगाच्या नव्या रुग्णांवर उपचार होतात. 
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार पुढच्या दशकभरात २०२५  पर्यंत भारतात कर्करोगग्रस्त रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढणार आहे. यामुळे कुटुंबांवरील आर्थिक खर्चाचा बोजा सुद्धा वाढणार आहे. आरोग्य मंत्रालयाने पुढच्या दहावर्षात कर्करोग, मधुमेह आणि ह्दयविकारामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी आरोग्य मंत्रालय विविध उपायोजना आखत आहे. 
 
कर्करोगामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जीवनशैलीमध्ये सुधारणा,  पोषक आहार, प्रदूषण नियंत्रण तसेच लवकरात लवकर आजाराचे निदान आवश्यक आहे.