शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

5 कोटीहून जास्त भारतीय तणावग्रस्त

By admin | Updated: February 24, 2017 14:55 IST

भारतातील पाच कोटींहून जास्त लोक तणावग्रस्त असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - भारतातील पाच कोटींहून जास्त लोक तणावग्रस्त असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. यामध्ये दक्षिणपूर्व आशिया आणि पश्चिम पॅसिफिक परिसरातील भारतीयांची संख्या जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने जारी केलेल्या अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. अहवालानुसार चीन आणि भारत सर्वात जास्त तणावात असलेल्या देशांच्या यादीत आहेत. जगभरात तणावग्रस्त असलेल्यांची संख्या जवजवळ 32.2 कोटी असून, यातील 50 टक्के फक्त भारत आणि चीनमध्ये आहे.
 
2005 ते 2015 दरम्यान तणावग्रस्त लोकांची संख्या 18 टक्क्यांनी वाढली असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. तणावाव्यतिरिक्त भारत आणि चीनमध्ये 'चिंता' हीदेखील एक मोठी समस्या आहे. भारत आणि इतर मध्यम उत्पन्न देशांमध्ये चिंताग्रस्त असणं आत्महत्येचं एक मुख्य कारण आहे. 2015 मध्ये भारतात 3.8 कोटी लोक चिंताग्रस्त सारख्या समस्येमुळे पीडित होते. 
 
पुरुषांशी तुलना करता महिलांमध्ये तणाव आणि चिंतेची समस्या जास्त असल्याचं जाणवलं आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न देशांमध्ये एकूण 78 टक्के लोक आत्महत्या करत असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. 2012 मध्ये भारत आत्महत्या करणा-यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता.