शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

काश्मिरात आणखी ३,६०० जवान पाठविणार

By admin | Updated: April 17, 2016 03:10 IST

गेल्या चार दिवसांपासून जम्मू-काश्मिरात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे चिंतित केंद्र सरकारने खोऱ्यात निमलष्करी दलाचे अतिरिक्त ३,६०० जवान पाठविण्याचा निर्णय शनिवारी घेतला.

नवी दिल्ली: गेल्या चार दिवसांपासून जम्मू-काश्मिरात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे चिंतित केंद्र सरकारने खोऱ्यात निमलष्करी दलाचे अतिरिक्त ३,६०० जवान पाठविण्याचा निर्णय शनिवारी घेतला. तसेच यापुढे हिंसाचारात आणखी बळी जाऊ नयेत याची काळजी घेण्याची सूचना राज्य सरकारला केली. येथे आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली. त्यानंतर अतिरिक्त दल पाठविण्याचा निर्णय झाला. राज्यात मंगळवारपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात सुरक्षा दलाच्या कारवाईत पाच जण मृत्युमुखी पडल्यानंतर काश्मीरच्या काही भागात आज चौथ्या दिवशीही संचारबंदीसदृश निर्बंध कायम आहेत. गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार निमलष्करी दलाच्या १२ कंपन्या आज आणि २४ उद्यापर्यंत राज्यात डेरेदाखल होत आहेत. एका कंपनीत जवळपास १०० जवान असतात. परिस्थितीवर नजरगृह मंत्रालय जम्मू-काश्मीरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून परिस्थितीवर नजर ठेवून आहे. राज्यात सामान्य परिस्थिती निर्माण करण्याच्या दृष्टीने संपूर्ण सहकार्याचे आश्वासन केंद्राने दिले आहे. मोबाईल इंटरनेट सेवा बंदचकश्मीरच्या काही भागात चौथ्या दिवशीही संचारबंदीसदृश निर्बंध कायम असून संपूर्ण खोऱ्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंदच ठेवण्यात आली आहे.पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कायदा व्यवस्था बिघडू नये यादृष्टीने कुपवाडा आणि हंदवाडासह उत्तर काश्मीरच्या काही भागात कडक निर्बंध लागू आहेत. खबरदारी म्हणून श्रीनगरच्या काही पोलीस ठाणे क्षेत्रातही निर्बंध कायम आहेत. पीडीपीचा आरोपकाश्मीरमध्ये अशांतता पसरली असताना काही स्वार्थी लोक हेतुपुरस्सर हिंसाचाराचा प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीने (पीडीपी) शनिवारी केला.(लोकमत न्यूज नेटवर्क)