शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

काश्मिरात आणखी ३,६०० जवान पाठविणार

By admin | Updated: April 17, 2016 03:10 IST

गेल्या चार दिवसांपासून जम्मू-काश्मिरात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे चिंतित केंद्र सरकारने खोऱ्यात निमलष्करी दलाचे अतिरिक्त ३,६०० जवान पाठविण्याचा निर्णय शनिवारी घेतला.

नवी दिल्ली: गेल्या चार दिवसांपासून जम्मू-काश्मिरात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे चिंतित केंद्र सरकारने खोऱ्यात निमलष्करी दलाचे अतिरिक्त ३,६०० जवान पाठविण्याचा निर्णय शनिवारी घेतला. तसेच यापुढे हिंसाचारात आणखी बळी जाऊ नयेत याची काळजी घेण्याची सूचना राज्य सरकारला केली. येथे आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली. त्यानंतर अतिरिक्त दल पाठविण्याचा निर्णय झाला. राज्यात मंगळवारपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात सुरक्षा दलाच्या कारवाईत पाच जण मृत्युमुखी पडल्यानंतर काश्मीरच्या काही भागात आज चौथ्या दिवशीही संचारबंदीसदृश निर्बंध कायम आहेत. गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार निमलष्करी दलाच्या १२ कंपन्या आज आणि २४ उद्यापर्यंत राज्यात डेरेदाखल होत आहेत. एका कंपनीत जवळपास १०० जवान असतात. परिस्थितीवर नजरगृह मंत्रालय जम्मू-काश्मीरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून परिस्थितीवर नजर ठेवून आहे. राज्यात सामान्य परिस्थिती निर्माण करण्याच्या दृष्टीने संपूर्ण सहकार्याचे आश्वासन केंद्राने दिले आहे. मोबाईल इंटरनेट सेवा बंदचकश्मीरच्या काही भागात चौथ्या दिवशीही संचारबंदीसदृश निर्बंध कायम असून संपूर्ण खोऱ्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंदच ठेवण्यात आली आहे.पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कायदा व्यवस्था बिघडू नये यादृष्टीने कुपवाडा आणि हंदवाडासह उत्तर काश्मीरच्या काही भागात कडक निर्बंध लागू आहेत. खबरदारी म्हणून श्रीनगरच्या काही पोलीस ठाणे क्षेत्रातही निर्बंध कायम आहेत. पीडीपीचा आरोपकाश्मीरमध्ये अशांतता पसरली असताना काही स्वार्थी लोक हेतुपुरस्सर हिंसाचाराचा प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीने (पीडीपी) शनिवारी केला.(लोकमत न्यूज नेटवर्क)