शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनची तारीख चुकणार; गुरुवारी केरळ किनाऱ्यावर धडकणार

By admin | Updated: June 1, 2015 02:05 IST

अंदमानातून निघाल्यानंतरही पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती नसल्यामुळे मान्सूनचे आगमन नियमित वेळापत्रकापेक्षा तीन ते चारदिवस दिवस

नवी दिल्ली : अंदमानातून निघाल्यानंतरही पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती नसल्यामुळे मान्सूनचे आगमन नियमित वेळापत्रकापेक्षा तीन ते चारदिवस दिवस लांबणार आहे. येत्या ४ जून रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.भारतीय हवामान विभागाच्या मान्सून पूर्वानुमान विभागाचे प्रमुख डी.एस. पाई यांनी रविवारी ही माहिती दिली. मान्सूनच्या प्रगतीसाठी तूर्तास स्थिती अनुकूल नाही. त्यामुळे मान्सूनचे आगमन लांबणार आहे. मान्सूनच्या अंदमानापर्यंतच्या प्रवासानुसार, तो ३० मे रोजीच केरळात दाखल होण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता.२१ मेपर्यंत नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या खाडीत व श्रीलंकेच्या दक्षिण भागांपर्यंत पोहोचले. मात्र यानंतर आठवडाभर येथेच अडकून बसले. अरबी समुद्रातील प्रतिचक्रवातामुळे मान्सूचा वेग मंदावला आहे. येत्या ४ जूनपर्यंत स्थिती अनूकूल होऊन मान्सून केरळ किनारपट्टीवर धडकेल, अशी अपेक्षा असल्याचे पाई म्हणाले. मान्सून त्याच्या लहरीपणासाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा यामुळे हवामान खात्याचे अंदाज चुकताना दिसतात. यंदा श्रीलंकेच्या हमबनटोटा येथे मान्सून अडकून बसला आहे.आंध्रात आणखी ४१ उष्मा बळीदेशाच्या अनेक भागांत उष्णतेचा कहर जारी असून गत २४ तासांत आंध्र प्रदेशात उष्माघाताने आणखी ४१ जण मृत्युमुखी पडले आहेत. देशभरातील उष्माघाताच्या बळींची संख्या २२४८ वर पोहोचली आहे. आंध्रातील बळीसंख्या १६७७ झाली आहे. तर शेजारच्याच तेलंगणा राज्यात आत्तापर्यंत ५४१ जण मृत्युमुखी पडले आहेत. नागपुरात रविवारी सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. (लोकमत न्यूज नेटवर्क)