शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

मोदींच्या हायटेक स्वप्नात माकडांचे विघ्न

By admin | Updated: April 2, 2015 23:44 IST

भरघोस मताधिक्याने निवडून देणाऱ्या वाराणसी शहराला हायटेक करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे;

वाराणसी : भरघोस मताधिक्याने निवडून देणाऱ्या वाराणसी शहराला हायटेक करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे; पण या स्वप्नाच्या पूर्ततेत सध्या अनेक विघ्ने येत असून, सर्वात मोठा त्रास माकडांचा आहे. गंगा नदीकिनारी टाकलेल्या फायबर केबल माकडांनी तोडून टाकल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली असून, हा प्रश्न सोडवावा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. वाराणसी शहरातील अडचणी माकडांची अडचण तर आहेच, पण वाराणसी शहर हे गर्दीचे आहे. शहरात २० लाख लोक राहत असून, प्रत्येक विभागात खचाखच गर्दी आहे, त्यामुळे येथे अंडरग्राऊंड केबल टाकणेही कठीण जात आहे. मोदी यांची योजना भारतातील २ लाख ५० हजार खेडी परस्परांशी जोडण्यासाठी मोदी सरकारने तीन वर्षांच्या कालावधीत ७ लाख कि.मी. ब्रॉडबँड केबल टाकण्याचा निर्धार केला आहे. त्याचप्रमाणे २०२० पर्यंत १०० नवी स्मार्ट शहरे बांधली जाणार असून, या शहरांना इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरून शिक्षण व आरोग्य सुविधा देण्याचीही योजना आहे. या योजनेअंतर्गत विकसित केले जाणारे वाराणसी हे पहिले शहर असून, २५०० जागी ब्रॉडबँड केंद्रे सुरू केली जाणार आहेत.तसेच देशात अधिकाधिक लोकांकडे स्मार्टफोन यावेत अशीही योजना आहे. २०१७ पर्यंत भारतातील एक तृतीयांश लोकसंख्येकडे स्मार्ट फोन असतील, त्यांचा इंटरनेटशी संपर्क असेल असे मोदी सरकारचे स्वप्न आहे. इंटरनेटचा प्रसार होऊन ते अधिक स्वस्त झाल्यास भारताच्या जीडीपीत चार वर्षांच्या कालावधीत ७० अब्ज डॉलरची भर पडू शकते असे हे गणित आहे. पण भारतातील गर्दी व गोंधळ असणाऱ्या शहरांत तंत्रज्ञानाने शिस्त आणणे हे एक मोठे आव्हान आहे. (वृत्तसंस्था)