शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

मोदींच्या हायटेक स्वप्नात माकडांचे विघ्न

By admin | Updated: April 2, 2015 23:44 IST

भरघोस मताधिक्याने निवडून देणाऱ्या वाराणसी शहराला हायटेक करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे;

वाराणसी : भरघोस मताधिक्याने निवडून देणाऱ्या वाराणसी शहराला हायटेक करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे; पण या स्वप्नाच्या पूर्ततेत सध्या अनेक विघ्ने येत असून, सर्वात मोठा त्रास माकडांचा आहे. गंगा नदीकिनारी टाकलेल्या फायबर केबल माकडांनी तोडून टाकल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली असून, हा प्रश्न सोडवावा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. वाराणसी शहरातील अडचणी माकडांची अडचण तर आहेच, पण वाराणसी शहर हे गर्दीचे आहे. शहरात २० लाख लोक राहत असून, प्रत्येक विभागात खचाखच गर्दी आहे, त्यामुळे येथे अंडरग्राऊंड केबल टाकणेही कठीण जात आहे. मोदी यांची योजना भारतातील २ लाख ५० हजार खेडी परस्परांशी जोडण्यासाठी मोदी सरकारने तीन वर्षांच्या कालावधीत ७ लाख कि.मी. ब्रॉडबँड केबल टाकण्याचा निर्धार केला आहे. त्याचप्रमाणे २०२० पर्यंत १०० नवी स्मार्ट शहरे बांधली जाणार असून, या शहरांना इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरून शिक्षण व आरोग्य सुविधा देण्याचीही योजना आहे. या योजनेअंतर्गत विकसित केले जाणारे वाराणसी हे पहिले शहर असून, २५०० जागी ब्रॉडबँड केंद्रे सुरू केली जाणार आहेत.तसेच देशात अधिकाधिक लोकांकडे स्मार्टफोन यावेत अशीही योजना आहे. २०१७ पर्यंत भारतातील एक तृतीयांश लोकसंख्येकडे स्मार्ट फोन असतील, त्यांचा इंटरनेटशी संपर्क असेल असे मोदी सरकारचे स्वप्न आहे. इंटरनेटचा प्रसार होऊन ते अधिक स्वस्त झाल्यास भारताच्या जीडीपीत चार वर्षांच्या कालावधीत ७० अब्ज डॉलरची भर पडू शकते असे हे गणित आहे. पण भारतातील गर्दी व गोंधळ असणाऱ्या शहरांत तंत्रज्ञानाने शिस्त आणणे हे एक मोठे आव्हान आहे. (वृत्तसंस्था)