शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

आरटीआयसाठी मोदींचा ‘थ्री टी मंत्र’

By admin | Updated: October 16, 2015 23:40 IST

सध्याच्या काळात गोपनीयतेला कोणतेही स्थान नाही. माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) मागवण्यात आलेले उत्तर वेळेत पारदर्शकता राखत आणि कोणतीही अडचण निर्माण होणार नाही

नवी दिल्ली : सध्याच्या काळात गोपनीयतेला कोणतेही स्थान नाही. माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) मागवण्यात आलेले उत्तर वेळेत पारदर्शकता राखत आणि कोणतीही अडचण निर्माण होणार नाही अशा पद्धतीने जनतेकडे दिले जावे. त्यासाठी त्यांनी ‘टाइमली, ट्रान्स्परन्ट आणि ट्रबल-फ्री’ हा ३ टीचा मंत्र सांगितला.केंद्रीय माहिती आयोगाच्या १० व्या वार्षिक संमेलनात ते बोलत होते. माहितीचा अधिकार कायदा सर्वसामान्यांसाठी असून त्यांना सत्तेवर असलेल्यांना जाब विचारण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. आपण पारदर्शकता अधिक बळकट केल्यास लोकांचा लोकशाहीवरील विश्वास आणखी दृढ होईल, असे ते म्हणाले.माहिती मागवण्याची प्रक्रिया पारदर्शक असावी. विलंबाने मिळालेली माहिती प्रश्न सोडविण्यास मदत करीत नाही, उलट तो वाढविण्यास हातभार लावते. वेळीच दिलेल्या माहितीमुळे चुकीचे निर्णय रोखले जाऊ शकतात. आम्ही त्यावर भर देत आहोत, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)आरटीआयच्या मूळ कल्पनेला पूरक अशीच महत्त्वांकाक्षी डिजिटल इंडिया योजना आहे. अधिकाधिक बाबी आॅनलाईन झाल्या की, पारदर्शकता आणखी वाढेल. प्रश्न उपस्थित करण्याला वाव दिला जावा. एखाद्या नागरिकाने छोटाही प्रश्न विचारल्यास धोरणात्मक बदल घडविणे भाग पडू शकते. सत्तेवर असलेल्यांना योग्य जाब विचारण्याचे अस्त्र सर्वसामान्यांच्या हाती आले आहे.