शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची आश्वासने केवळ ‘हवाबाजी’

By admin | Updated: September 9, 2015 08:19 IST

मोदींनी निवडणूक प्रचाराच्या वेळी दिलेली आश्वासने केवळ ‘हवाबाजी’ आणि निवडणूक जुमला असल्याचे सिद्ध झाले आहे. वास्तविकतेचे भान नसलेल्या रालोआ सरकारने अपयश

नवी दिल्ली : मोदींनी निवडणूक प्रचाराच्या वेळी दिलेली आश्वासने केवळ ‘हवाबाजी’ आणि निवडणूक जुमला असल्याचे सिद्ध झाले आहे. वास्तविकतेचे भान नसलेल्या रालोआ सरकारने अपयश झाकण्यासाठी केवळ सारवासारव चालविली आहे, या शब्दांत सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सरकारवर जोरदार प्रहार केला.राहुल गांधी यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मोहीम छेडल्यामुळेच भूसंपादन विधेयकाबाबत सरकारला माघार घेणे भाग पडले. त्याचे श्रेय पूर्णपणे कार्यकर्त्यांना देतानाच त्यांनी कामगार सुधारणा, महिला आणि बालकल्याण, माहिती अधिकार कायदा आणि मनरेगासारख्या योजनांसाठीही सरकारविरुद्ध अशाच पद्धतीचे आंदोलन पुकारण्याचे आवाहन केले. मोदींनी मीडिया इव्हेंटस्ला महत्त्व देत घोषणा दिल्या; मात्र त्यांना शब्द पाळता आलेला नाही. हेडलाईन्स देण्यावर जोर दिला, पण प्रत्यक्षात आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. गेल्या आठवड्यात दिल्लीत रा.स्व.संघ आणि संलग्न १५ संघटनांची बैठक झाली.दुष्काळ आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्षदेशाच्या विविध भागात दुष्काळाची स्थिती आहे. शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडला आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस किंवा पाऊसच नसल्यामुळे पिके नष्ट झाली आहेत. मोदी सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील बनले आहे. कलबुर्गी, पानसरेंचा उल्लेखपुरोगामी विचारवंत आणि लेखकांना जीवानिशी संपवले जात आहे, असे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षपणे अलीकडेच हत्या झालेल्या डॉ. एम.एम. कलबुर्गी आणि गोविंद पानसरे यांचा अप्रत्यक्ष उल्लेख केला.