शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

मोदींचे मॅक्सिमम गव्हर्नमेंट, दोन वर्षात दोन लाख नोकरभरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 15:11 IST

दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स' ही घोषणा लोकप्रिय ठरली होती.

ऑनलाइन लोकमत 

 
नवी दिल्ली, दि. १८ - दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स' ही घोषणा लोकप्रिय ठरली होती. घोषणेनुसार कारभार होईल असे लोकांना वाटले होते. पण प्रत्यक्षात सरकारी नोकरभरतीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर , इथे मॅक्सिमम गव्हर्नमेंट आणि मिनिमम गव्हर्नन्स होताना दिसत आहे. 
 
एक मार्च २०१५ रोजी केंद्रीय कर्मचा-यांची एकूण संख्या ३३.०५ लाख होती. २०१६ मध्ये हाच आकडा ३४.९३ लाख झाला आणि एक मार्च २०१७ पर्यंत केंद्रीय कर्मचा-यांची संख्या ३५.२३ लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. रेल्वे केंद्र सरकारचा भाग असून, रेल्वेच्या कर्मचा-यांची एकूण संख्या १३,२६,४३७ आहे. तीन वर्षात रेल्वेने आपला एकही कर्मचारी वाढवलेला नाही. 
 
सरकारच्या महसूली विभागामध्ये ७० हजारपर्यंत कर्मचारी संख्या वाढेल असा अंदाज आहे. यामध्ये आयकर खाते, कस्टम आणि उत्पादन शुल्क विभागांचा समावेश होतो. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणा-या केंद्रीय निमलष्करी दलामध्ये ४७ हजारांपर्यंत नव्या कर्मचा-यांची भरती होईल असा अंदाज आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने २२०० कर्मचा-यांची भरती केली आहे.