शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

काळा पैसा सफेद करण्यासाठी मोदींची फेअर अँड लव्हली योजना

By admin | Updated: March 2, 2016 17:56 IST

काळा पैसा सफेद करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने फेअर अँण्ड लव्हली योजना आणली आहे अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केंद्र सरकारवर हल्ला चढवला.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. २ - निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी काळापैसा बाळगणा-यांना तुरुंगात टाकणार असे  सांगत होते मात्र आता त्यांनाच वाचवण्यासाठी ते  योजना घेऊन आले आहेत.काळा पैसा सफेद करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने फेअर अँण्ड लव्हली योजना आणली आहे अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केंद्र सरकारवर हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी सरकारच्या मेक इन इंडिया योजनेसह एकूण मोदींच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. निवडणुकीत मोदींनी रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते पण कोणलाही रोजगार मिळालेला नाही. मनरेंगा इतकी वाईट योजना मी बघितलेली नाही असे नरेंद्र मोदी सांगतात पण अर्थमंत्री अरुण जेटली मला येऊन सांगतात मनरेगा इतकी चांगली योजना नाही. मग हीच बाब ते पंतप्रधानांना का सांगत नाहीत ? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. पंतप्रधानांनी आमचे ऐकावे, आम्ही त्यांचे शत्रू नाहीत. आम्ही तुमचा व्देष करत नाही असे राहुल म्हणाले. मुंबईवरील २६/११ हल्ल्याच्यावेळी मोदींना मुंबईत जाऊ नका अशी भारत सरकारने विनंती केली होती. मात्र त्यांनी आमचे  ऐकले का ? मोदी मुंबईत गेले आणि त्यामुळे कारवाईत अडथळे आले असा आरोप राहुल यांनी केला. मोदी कोणाचेही ऐकत नाहीत. त्यांनी नागा करारावर स्वाक्षरी केली त्याची गृहमंत्र्यांनाही माहिती नव्हती असे राहुल म्हणाले. भाषणाच्या आघोत राहुल गांधी गांधींजी आमचे आहेत, सावरकर तुमचे यात चूक काय ? असे विधान केले. राहुल गांधी यांच्या संपूर्ण भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निशाण्यावर होते. आता मोदी त्यांना काय उत्तर देतात याची उत्सुक्ता आहे.

 

राहुल गांधी यांच्या भाषणातील मुद्दे

अरुण जेटली मला भेटले आणि सांगितले मनरेगा इतकी दुसरी कोणतीही चांगली योजना नाही, मग हेच ते पंतप्रधानांना का सांगत नाहीत ? मेक इन इंडिया सुरु केले पण किती लोकांना रोजगार मिळाला काळापैसा बाळगणा-यांना तुरुंगात टाकणार असल्याचे ते सांगत होते मात्र आता त्यांना वाचवण्याची योजना ते घेऊन आले आहेत निवडणुकीपूर्वी मोदी म्हणत होते डाळ ७० रुपये किलो आहे, किंमती कमी करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते पण आता डाळीची किंमत प्रतिकिलो २०० आहे  पाकिस्तानने मुबई हल्ला केला आणि आपल्या पंतप्रधानांनी काय केलं ? कोणताही विचार न करता पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत चहा प्यायला गेले जेव्हा मुंबई हल्ला झाला सरकारने नरेंद्र मोदींना मुंबई दौरा न करण्याची विनंती केली होती, पण त्यांनी ऐकल नाही ध्वजाचा आदर म्हणजे प्रत्येक मताचा आदर करणे  पंतप्रधान कुणाचा सल्ला ऐकतात, कोणाच्या मताचा आदर करतात   हा देश म्हणजे पंतप्रधान नाही आणि पंतप्रधान म्हणजे हा देश नाही   न्यायालयात प्राध्यापक, विद्यार्थ्यांना मारले तेव्हा पंतप्रधान गप्प का बसले ?   तुम्ही जेएनयू आणि गरीबांना चिरडू शकत नाही  गांधीची आमचे आहेत, सावरकर तुमचे यात चूक काय काळा पैसा सफेद करण्यासाठी सरकारने फेअर अँण्ड लव्हली योजना आणली आहे