शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

काळा पैसा सफेद करण्यासाठी मोदींची फेअर अँड लव्हली योजना

By admin | Updated: March 2, 2016 17:56 IST

काळा पैसा सफेद करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने फेअर अँण्ड लव्हली योजना आणली आहे अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केंद्र सरकारवर हल्ला चढवला.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. २ - निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी काळापैसा बाळगणा-यांना तुरुंगात टाकणार असे  सांगत होते मात्र आता त्यांनाच वाचवण्यासाठी ते  योजना घेऊन आले आहेत.काळा पैसा सफेद करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने फेअर अँण्ड लव्हली योजना आणली आहे अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केंद्र सरकारवर हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी सरकारच्या मेक इन इंडिया योजनेसह एकूण मोदींच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. निवडणुकीत मोदींनी रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते पण कोणलाही रोजगार मिळालेला नाही. मनरेंगा इतकी वाईट योजना मी बघितलेली नाही असे नरेंद्र मोदी सांगतात पण अर्थमंत्री अरुण जेटली मला येऊन सांगतात मनरेगा इतकी चांगली योजना नाही. मग हीच बाब ते पंतप्रधानांना का सांगत नाहीत ? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. पंतप्रधानांनी आमचे ऐकावे, आम्ही त्यांचे शत्रू नाहीत. आम्ही तुमचा व्देष करत नाही असे राहुल म्हणाले. मुंबईवरील २६/११ हल्ल्याच्यावेळी मोदींना मुंबईत जाऊ नका अशी भारत सरकारने विनंती केली होती. मात्र त्यांनी आमचे  ऐकले का ? मोदी मुंबईत गेले आणि त्यामुळे कारवाईत अडथळे आले असा आरोप राहुल यांनी केला. मोदी कोणाचेही ऐकत नाहीत. त्यांनी नागा करारावर स्वाक्षरी केली त्याची गृहमंत्र्यांनाही माहिती नव्हती असे राहुल म्हणाले. भाषणाच्या आघोत राहुल गांधी गांधींजी आमचे आहेत, सावरकर तुमचे यात चूक काय ? असे विधान केले. राहुल गांधी यांच्या संपूर्ण भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निशाण्यावर होते. आता मोदी त्यांना काय उत्तर देतात याची उत्सुक्ता आहे.

 

राहुल गांधी यांच्या भाषणातील मुद्दे

अरुण जेटली मला भेटले आणि सांगितले मनरेगा इतकी दुसरी कोणतीही चांगली योजना नाही, मग हेच ते पंतप्रधानांना का सांगत नाहीत ? मेक इन इंडिया सुरु केले पण किती लोकांना रोजगार मिळाला काळापैसा बाळगणा-यांना तुरुंगात टाकणार असल्याचे ते सांगत होते मात्र आता त्यांना वाचवण्याची योजना ते घेऊन आले आहेत निवडणुकीपूर्वी मोदी म्हणत होते डाळ ७० रुपये किलो आहे, किंमती कमी करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते पण आता डाळीची किंमत प्रतिकिलो २०० आहे  पाकिस्तानने मुबई हल्ला केला आणि आपल्या पंतप्रधानांनी काय केलं ? कोणताही विचार न करता पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत चहा प्यायला गेले जेव्हा मुंबई हल्ला झाला सरकारने नरेंद्र मोदींना मुंबई दौरा न करण्याची विनंती केली होती, पण त्यांनी ऐकल नाही ध्वजाचा आदर म्हणजे प्रत्येक मताचा आदर करणे  पंतप्रधान कुणाचा सल्ला ऐकतात, कोणाच्या मताचा आदर करतात   हा देश म्हणजे पंतप्रधान नाही आणि पंतप्रधान म्हणजे हा देश नाही   न्यायालयात प्राध्यापक, विद्यार्थ्यांना मारले तेव्हा पंतप्रधान गप्प का बसले ?   तुम्ही जेएनयू आणि गरीबांना चिरडू शकत नाही  गांधीची आमचे आहेत, सावरकर तुमचे यात चूक काय काळा पैसा सफेद करण्यासाठी सरकारने फेअर अँण्ड लव्हली योजना आणली आहे