शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

मोदींनी कोट्यवधींची दलाली घेतली

By admin | Updated: December 22, 2016 04:59 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते २०१३-२०१४ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना दलाली म्हणून कोट्यवधी रुपये घेतले असा घणाघाती

हरिश गुप्ता / मेहसाणा/नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते २०१३-२०१४ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना दलाली म्हणून कोट्यवधी रुपये घेतले असा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी गुजरातच्या मेहसाणामधील जाहीर सभेत केला आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. या हल्ल्याला भाजपनेही तोडीसतोड उत्तर देत नॅशनल हेराल्डच्या पाच हजार कोटी रुपयांच्या खटल्यात राहुल गांधी जामिनावर असून त्यांचे कुटुंबीय आॅगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात गुंतलेले आहेत, असा प्रत्यारोप केला. राहुल गांधींनी केलेल्या आरोपाला तोंड देण्यासाठी भाजपने एकामागून एक नेते उतरवले व त्यांनी निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधी यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाच्या सत्यासत्यतेबद्दल भाष्य करण्यास नकार देताना, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, असे भाजपा नेते म्हणाले. मोदींच्या विरोधातील असलेली माहिती मी जाहीर केली तर भूकंप होईल, असा दावा राहुल यांनी गेल्या आठवड्यात केला होता. मात्र त्यांनी आज जाहीर केलेल्या माहितीचे प्रकरण वरिष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी आधीच सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केलेला आहे. सुनावणीसाठी ११ जानेवारी हा दिवस निश्चित केला आहे.मोदींनी ४० कोटींचा खुलासा करावामेहसाणाच्या सभेत राहुल गांधी म्हणाले, सहारा ग्रुपने नऊ हप्त्यांमध्ये मोदी यांना ४० कोटी रुपये दिले. पैसे दिल्याच्या डायरीतील नोंदी या बरोबर आहेत की नाही याचा खुलासा मोदी यांनी करावा. नोव्हेंबर २०१४ मध्ये प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी कंपनीवर छापा टाकल्यानंतर आणखी चौकशी व्हावी अशी शिफारस केली होती. पुढे चौकशी झाली की नाही हे कोणालाही माहिती नाही. मोदी मुख्यमंत्री असताना त्यांना कोट्यवधी रुपये देणाऱ्या आणखी एका उद्योगाचे नाव राहुल गांधी यांनी जाहीर केले. मला लोकसभेत बोलू दिले नाही म्हणून मी ही माहिती आज येथे जाहीर करीत आहे, असा खुलासाही त्यांनी केला.मोदी आता याची चौकशी करणार का?मोदी यांच्यावर राहुल यांनी अतिशय सावधपणे वरील आरोप केले. मला स्वतंत्रपणे चौकशी हवी आहे. मोदीजींनी समोर येऊन देशाला काय ते सांगावे, असे ते म्हणाले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही स्पष्ट केले की मोदीजींनी सहाराकडून पैसे स्वीकारले की नाही एवढेच राहुल विचारत आहेत. हा दस्तावेज प्राप्तीकर खात्याकडे असेल तर मोदी चौकशी करतील का?चौकशी अहवालावर भाजपाचे भाष्य नाहीज्या उद्योगांवर प्राप्तीकर विभागाने छापे टाकून चौकशी केली होती ती माझ्या हाती असल्याचे संकेत राहुल गांधी यांनी या जाहीर मेळाव्यात दिले. बहुधा याचमुळे ‘त्या’ दिलेल्या पैशांच्या अधिकृतपणे झालेल्या चौकशी अहवालावर कायदा आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद किंवा प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांच्यासह भाजपच्या कोणत्याही नेत्याने भाष्य केलेले नाही. रवी शंकर प्रसाद म्हणाले की, प्राप्तीकर खात्याने आपले काम केलेले असेलच व सर्वोच्च न्यायालयात त्यावर तीनवेळा सुनावणीही झाली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी त्यावर काहीही बोलणार नाही.