शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

काश्मीरच्या स्थितीवर चर्चेस मोदी तयार : मुफ्ती

By admin | Updated: April 25, 2017 00:47 IST

खोऱ्यातील चिघळलेली परिस्थिती रोखण्यासाठी संबंधित गटांशी चर्चा करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयारी दाखवली आहे,

नवी दिल्ली : खोऱ्यातील चिघळलेली परिस्थिती रोखण्यासाठी संबंधित गटांशी चर्चा करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयारी दाखवली आहे, असे जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी म्हटले; मात्र चर्चेसाठी तसे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोदी यांची त्यांच्या येथील निवासस्थानी मुफ्ती यांनी २० मिनिटे भेट घेतल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘‘दगडफेक आणि गोळीबार होत असताना चर्चा घडू शकत नाही.’’ भेटीत मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काश्मीर धोरणाचा उल्लेख केला. वाजपेयी यांच्या धोरणानुसार चर्चा जेथे थांबली होती तेथून ती परत सुरू केली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. याचा अर्थ फुटीरवाद्यांशी चर्चा करा अशी त्यांची उघड सूचना आहे. खोऱ्यातील परिस्थिती सामान्य झाली की चर्चा करण्याचा मोदी यांचा हेतू आहे, असे त्यांनी सांगितले. चर्चा हाच एकमेवर पर्याय आहे. संघर्ष किती लांबवणार, असे मुफ्ती म्हणाल्या. वाजपेयी पंतप्रधान व लालकृष्ण अडवाणी उपपंतप्रधान असताना हुरियत कॉन्फरन्सशी चर्चा झाली होती. ती चर्चा जेथे थांबली होती तेथून ती परत सुरू करण्याची गरज आम्हाला आहे, असे त्यांनी म्हटले. वाढत्या दगडफेकीबद्दल त्या म्हणाल्या की, काही तरुणांचा भ्रमनिरास झाला असून, काही तरुणांना दगडफेकीसाठी फेसबुक व व्हॉटस्अ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांतून चिथावणी दिली जात आहे.मुफ्ती यांनी खोऱ्यातील परिस्थिती येत्या दोन ते तीन महिन्यांत सुधारेल व त्यानंतर चर्चेसाठी पुढाकार घेतला जाईल, असे म्हटले. गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन त्यांनी खोऱ्यातील परिस्थितीवर चर्चा केली. येते दोन ते तीन महिने खूप महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. चर्चा कधी सुरू करायची याचा निर्णय केंद्रातील उच्च पातळीवरील नेते घेतील.