शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

काश्मीरच्या स्थितीवर चर्चेस मोदी तयार : मुफ्ती

By admin | Updated: April 25, 2017 00:47 IST

खोऱ्यातील चिघळलेली परिस्थिती रोखण्यासाठी संबंधित गटांशी चर्चा करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयारी दाखवली आहे,

नवी दिल्ली : खोऱ्यातील चिघळलेली परिस्थिती रोखण्यासाठी संबंधित गटांशी चर्चा करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयारी दाखवली आहे, असे जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी म्हटले; मात्र चर्चेसाठी तसे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोदी यांची त्यांच्या येथील निवासस्थानी मुफ्ती यांनी २० मिनिटे भेट घेतल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘‘दगडफेक आणि गोळीबार होत असताना चर्चा घडू शकत नाही.’’ भेटीत मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काश्मीर धोरणाचा उल्लेख केला. वाजपेयी यांच्या धोरणानुसार चर्चा जेथे थांबली होती तेथून ती परत सुरू केली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. याचा अर्थ फुटीरवाद्यांशी चर्चा करा अशी त्यांची उघड सूचना आहे. खोऱ्यातील परिस्थिती सामान्य झाली की चर्चा करण्याचा मोदी यांचा हेतू आहे, असे त्यांनी सांगितले. चर्चा हाच एकमेवर पर्याय आहे. संघर्ष किती लांबवणार, असे मुफ्ती म्हणाल्या. वाजपेयी पंतप्रधान व लालकृष्ण अडवाणी उपपंतप्रधान असताना हुरियत कॉन्फरन्सशी चर्चा झाली होती. ती चर्चा जेथे थांबली होती तेथून ती परत सुरू करण्याची गरज आम्हाला आहे, असे त्यांनी म्हटले. वाढत्या दगडफेकीबद्दल त्या म्हणाल्या की, काही तरुणांचा भ्रमनिरास झाला असून, काही तरुणांना दगडफेकीसाठी फेसबुक व व्हॉटस्अ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांतून चिथावणी दिली जात आहे.मुफ्ती यांनी खोऱ्यातील परिस्थिती येत्या दोन ते तीन महिन्यांत सुधारेल व त्यानंतर चर्चेसाठी पुढाकार घेतला जाईल, असे म्हटले. गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन त्यांनी खोऱ्यातील परिस्थितीवर चर्चा केली. येते दोन ते तीन महिने खूप महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. चर्चा कधी सुरू करायची याचा निर्णय केंद्रातील उच्च पातळीवरील नेते घेतील.