शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

संघाच्या अजेंड्याच्या दिशेने मोदी सरकारचे मार्गक्रमण

By admin | Updated: July 13, 2016 02:56 IST

रा.स्व. संघाच्या मूळ अजेंड्याच्या दिशेने हळूहळू का होईना, मोदी सरकारचे मार्गक्रमण सुरू झाले आहे. समान नागरी कायद्याबाबत देश लगेच सहमत होणार नसला

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीरा.स्व. संघाच्या मूळ अजेंड्याच्या दिशेने हळूहळू का होईना, मोदी सरकारचे मार्गक्रमण सुरू झाले आहे. समान नागरी कायद्याबाबत देश लगेच सहमत होणार नसला, तरी सरकारने या विषयाबाबत किमान दोन पावले पुढे टाकण्याचे धाडस दाखवले आहे. गोरक्षा व गोवंश संरक्षणाबाबतही सरकारची भूमिका संघाच्या विचारसरणीला पूरकच ठरली आहे. सुब्रमण्यम स्वामींचे स्वयंघोषित प्रयत्न वगळता, राम जन्मभूमीबाबत सरकारने सावध पवित्रा स्वीकारला आहे. अशा वादग्रस्त विषयांच्या निराकरणास थोडा वेळ लागतो, याची संघाला कल्पना आहे. राज्यघटनेतला अनुच्छेद ३७0 रद्द करण्याबाबत सरकार आणि संघाचा विचार तूर्त समान पातळीवर आहे. संघ आणि सरकारमध्येमतभेद असल्याची चर्चा अधूनमधून ऐकायला मिळते. तथापि, गेल्या २ वर्षांत संघ व सरकारच्या भूमिकेत टोकाचा संघर्ष उद्भवल्याची फारशी उदाहरणे नाहीत. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत संघाचे स्वयंसेवक फारसे सक्रिय नव्हते. बिहार निवडणुकीच्या ऐन तोंडावर सरसंघचालक मोहनराव भागवतांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वादग्रस्त विधानांचा दुष्परिणाम भाजपाला भोगावा लागला. थेट परदेशी गुंतवणूक, तसेच भू-संपादन विधेयकाबाबत सरकार आणि संघपरिवाराच्या भूमिकेत बरीच तफावत आहे, अशी उदाहरणे दिली जात असली, तरी सरकारच्या कामकाजात संघाने गैरवाजवी हस्तक्षेप केलेला नाही. अनेक मुद्द्यांबाबत सरकार आणि संघ यांच्यात तफावत असल्याचे चित्र जाणीवपूर्वक दाखवले जाते. कारण विरोधकांची स्पेस संघ भरून काढू इच्छितो. तथापि, आपला मूळ अजेंडा लागू करण्याच्या प्रयत्नात सरकार अडचणीत येऊ नये, या बाबतीत संघ कमालीचा दक्ष आहे. स्मृती इराणींचे मनुष्यबळ विकास खाते रा.स्व.संघाच्या सूचनेनुसार बदलण्यात आले, अशी चर्चा होत असली, तरी संघाशी सर्वाधिक जवळीक असलेल्या रामशंकर कथेरियांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र का मिळाला? असा प्रश्नही या निमित्ताने आपसूकच उपस्थित होतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)