शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारला झटका, अरुणाचलमध्ये काँग्रेसला सत्ता बहालीचा आदेश

By admin | Updated: July 13, 2016 11:34 IST

अरुणाचलप्रदेशमध्ये काँग्रेसला सत्ता बहाल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १३ - अरुणाचलप्रदेशमध्ये काँग्रेसला सत्ता बहाल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. उत्तराखंड पाठोपाठ अरुणाचलप्रदेश संदर्भातही सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा आदेश केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अरुणाचलचे राज्यपाल ज्योति प्रसाद राजखोवा यांनी दिलेल्या सर्व आदेशांना असंवैधानिक ठरवून सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश रद्द केले. 
 
१५ डिसेंबर २०१५ रोजीची स्थिती राज्यात पूर्ववत करा असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. अरुणाचलप्रदेशमध्ये २६ जानेवारीपासून राष्ट्रपती राजवट लागू होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे काँग्रेसच्या बंडखोरांनी भाजपच्या पाठिंब्याने स्थापन केलेले सरकार बेकायद ठरले आहे. 
 
अरुणाचल संदर्भातील हा निकाल फक्त त्या राज्यावरच नव्हे तर, अन्य राज्यावरही परिणाम करेल असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. 
 
त्यापूर्वी बंडखोर काँग्रेस नेते कालीखो पूल यांनी १८ बंडखोर काँग्रेस आमदार, दोन अपक्ष आणि अकरा भाजप आमदारांच्या पाठिंब्यावर नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. ६० सदस्यांच्या अरुणाचल विधानसभेत काँग्रेसचे ४७ आमदार आहेत. त्यातील २१ आमदारांनी बंडखोरी करुन काँग्रेसच्या विरोधात गेले.