शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मोदी सरकारला झटका, अरुणाचलमध्ये काँग्रेसला सत्ता बहालीचा आदेश

By admin | Updated: July 13, 2016 11:34 IST

अरुणाचलप्रदेशमध्ये काँग्रेसला सत्ता बहाल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १३ - अरुणाचलप्रदेशमध्ये काँग्रेसला सत्ता बहाल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. उत्तराखंड पाठोपाठ अरुणाचलप्रदेश संदर्भातही सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा आदेश केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अरुणाचलचे राज्यपाल ज्योति प्रसाद राजखोवा यांनी दिलेल्या सर्व आदेशांना असंवैधानिक ठरवून सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश रद्द केले. 
 
१५ डिसेंबर २०१५ रोजीची स्थिती राज्यात पूर्ववत करा असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. अरुणाचलप्रदेशमध्ये २६ जानेवारीपासून राष्ट्रपती राजवट लागू होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे काँग्रेसच्या बंडखोरांनी भाजपच्या पाठिंब्याने स्थापन केलेले सरकार बेकायद ठरले आहे. 
 
अरुणाचल संदर्भातील हा निकाल फक्त त्या राज्यावरच नव्हे तर, अन्य राज्यावरही परिणाम करेल असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. 
 
त्यापूर्वी बंडखोर काँग्रेस नेते कालीखो पूल यांनी १८ बंडखोर काँग्रेस आमदार, दोन अपक्ष आणि अकरा भाजप आमदारांच्या पाठिंब्यावर नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. ६० सदस्यांच्या अरुणाचल विधानसभेत काँग्रेसचे ४७ आमदार आहेत. त्यातील २१ आमदारांनी बंडखोरी करुन काँग्रेसच्या विरोधात गेले.