शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारला हटवा मगच पाकसोबत संबंध सुधारतील - मणिशंकर अय्यर

By admin | Updated: November 17, 2015 12:12 IST

भारतातून नरेंद्र मोदी सरकार हटवण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

कराची, दि. १७ -  भारतातून नरेंद्र मोदी सरकार हटवा, आम्हाला आणा मगच पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारतील असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केले आहे. मणिशंकर यांच्या विधानाने आता वाद निर्माण झाला असून यामुळे काँग्रेस अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी १० दिवसांपूर्वी पाकिस्तानी वृृत्तवाहिनी दुनिया टीव्हीवरील चर्चासत्रात सहभाग घेतला. या चर्चासत्रात मणिशंकर अय्यर, सुधींद्र कुलकर्णी आदी मंडळी उपस्थित होती. भारत - पाक संबंधांमध्ये सुधारणा कशी होईल असा सवाल चर्चासत्रात उपस्थित होताच अय्यर म्हणाले, यांना हटवा आणि आम्हाला आणा. यावर मुलाखतकर्त्याने 'हे काम तुम्हीदेखील करु शकता' असे सांगितले असता आम्ही मोदी सरकारला हटवणारच असे त्यांनी नमूद केले.पाकिस्तान हा लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीच्या प्रचाराचा मुद्दा नव्हता, सबका साथ सबका विकास या भूमिकेमुळेच मोदी सरकार सत्तेवर आले असे अय्यर यांनी म्हटले आहे. पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्यासाठी भारतात मनमोहन सिंग तर पाकमध्ये परवेझ मुशर्रफ यांच्यासारखे नेतृत्व गरजेचे आहे असा दावाही त्यांनी केला.

मोदी सरकारच्या पाक धोरणावर सुधींद्र कुलकर्णी यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. 'मोदींना पाकसोबत चांगले संबंध हवेत, पण ते काही अटीशर्ती टाकत आहेत. यामुळे चर्चाच सुरु नाही झाली व हे चुकीचे आहे' असे कुलकर्णी यांनी सांगितले.  यापूर्वी सलमान खुर्शीद यांनी पाकमध्ये जाऊन मोदी सरकारवर टीका केली होती तर नवाझ शरीफ यांचे कौतुक केले होते.