शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

मोदी सरकारला हटवा मगच पाकसोबत संबंध सुधारतील - मणिशंकर अय्यर

By admin | Updated: November 17, 2015 12:12 IST

भारतातून नरेंद्र मोदी सरकार हटवण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

कराची, दि. १७ -  भारतातून नरेंद्र मोदी सरकार हटवा, आम्हाला आणा मगच पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारतील असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केले आहे. मणिशंकर यांच्या विधानाने आता वाद निर्माण झाला असून यामुळे काँग्रेस अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी १० दिवसांपूर्वी पाकिस्तानी वृृत्तवाहिनी दुनिया टीव्हीवरील चर्चासत्रात सहभाग घेतला. या चर्चासत्रात मणिशंकर अय्यर, सुधींद्र कुलकर्णी आदी मंडळी उपस्थित होती. भारत - पाक संबंधांमध्ये सुधारणा कशी होईल असा सवाल चर्चासत्रात उपस्थित होताच अय्यर म्हणाले, यांना हटवा आणि आम्हाला आणा. यावर मुलाखतकर्त्याने 'हे काम तुम्हीदेखील करु शकता' असे सांगितले असता आम्ही मोदी सरकारला हटवणारच असे त्यांनी नमूद केले.पाकिस्तान हा लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीच्या प्रचाराचा मुद्दा नव्हता, सबका साथ सबका विकास या भूमिकेमुळेच मोदी सरकार सत्तेवर आले असे अय्यर यांनी म्हटले आहे. पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्यासाठी भारतात मनमोहन सिंग तर पाकमध्ये परवेझ मुशर्रफ यांच्यासारखे नेतृत्व गरजेचे आहे असा दावाही त्यांनी केला.

मोदी सरकारच्या पाक धोरणावर सुधींद्र कुलकर्णी यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. 'मोदींना पाकसोबत चांगले संबंध हवेत, पण ते काही अटीशर्ती टाकत आहेत. यामुळे चर्चाच सुरु नाही झाली व हे चुकीचे आहे' असे कुलकर्णी यांनी सांगितले.  यापूर्वी सलमान खुर्शीद यांनी पाकमध्ये जाऊन मोदी सरकारवर टीका केली होती तर नवाझ शरीफ यांचे कौतुक केले होते.