शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

मोदी सरकार जनतेसाठी त्रासदायक -सलमान रश्दी

By admin | Updated: May 7, 2014 05:21 IST

नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यास त्यांचे सरकार सर्वसामान्य जनतेसाठी त्रासदायक ठरेल व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते, असे भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी यांनी म्हटले आहे.

न्यूयॉर्क : भाजपा नेता नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यास त्यांचे सरकार सर्वसामान्य जनतेसाठी त्रासदायक ठरेल व भाजपा सत्तेवर आल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते, असे मूळ भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी यांनी म्हटले आहे.

न्यूयॉर्क येथे सध्या सुरू असलेल्या पेन वर्ल्ड व्हॉईस फेस्टिव्हलमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चाललेल्या परिसंवादात मोदी यांनी हे मत व्यक्त केले आहे. यासंदर्भात बोलताना रश्दी म्हणाले की, नरेंद्र मोदी सत्तेवर येतील या शक्यतेमुळे मी अत्यंत चिंतित आहे. आत्ता भाजपाकडे सत्ता नाही, तरीही पत्रकार व लेखकांना त्यांच्याकडून त्रास दिला जातो. मोदींचे समर्थक आताही सेन्सॉरशिप लावत असून, त्यांच्या समर्थकांचा कोप होऊ नये यासाठी लोक आताही त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोदी हे विघटनवादी असून कट्टरवाद्यांचे कट्टरवादी आहेत, असाही शेरा रश्दी यांनी मारला आहे. मोदी यांच्यासारखा पंतप्रधान भारतात कधीही सत्तेवर आलेला नाही, भाजपाला बहुमत मिळाल्यास मोदी सत्तेवर येतील अशी दाट शक्यता असून, पंतप्रधानपदामुळे मोदी यांच्यात काही बदल होतो काय हे पाहावे लागेल, असे रश्दी म्हणाले.

गेल्या महिन्यात रश्दी व शिल्पकार अनिश कपूर यांनी मोदी यांच्याविरोधात लिहिलेल्या खुल्या पत्रावर स्वाक्षरी केली होती. या पत्रावर अनेक लेखक, कलाकार व वकील यांनी स्वाक्षर्‍या केल्या होत्या. या पत्रानंतर भारतात सोशल मीडियावर हल्ले झाले, असा सलमान रश्दी यांचा आरोप आहे.