शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

‘आधार’ सार्वत्रिक करण्यास मोदी सरकार पुन्हा आग्रही

By admin | Updated: October 5, 2015 02:25 IST

पंतप्रधान कार्यालयाने पुढाकार घेतल्याने गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड व हरियाणा या भाजपाशासित राज्यांनी ‘आधार’चा वापर सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचे लाभ

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाने पुढाकार घेतल्याने गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड व हरियाणा या भाजपाशासित राज्यांनी ‘आधार’चा वापर सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचे लाभ पुरविण्यासाठी करण्याची मुभा मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केले आहेत.सर्वोच्च न्यायालयाने ११ आॅगस्ट रोजी दिलेल्या अंतरिम आदेशाने ‘आधार’ कार्डाचा वापर स्वयंपाकाच्या गॅसचे व रॉकेलसह रेशनवरील वस्तूंच्या वितरणापुरताच करण्याचे निर्बंध घातले आहेत. मात्र आता पंतप्रधान कार्यालयाने सरकारी योजनांसाठी ‘आधार’चा सार्वत्रिक वापर करण्यासाठी पुन्हा पुढाकार घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात सुधारणा करावी किंवा त्याविषयी खुलासा करावा, यासाठी नव्याने अर्ज करण्यात आले आहेत.भाजपाशासित राज्यांखेरीज रिझर्व्ह बँक, सेबी, इरडा आणि ‘प्रेडा’ या बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील नियामक संस्थांनीही हे अर्ज केले आहेत. या अर्जांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या मंगळवारी विचार होणे अपेक्षित आहे.मोदी यांच्यासाठी जनधन योजना, आधार आणि मोबाइल शासन या त्रिमूर्तीत ‘आधार’ला महत्त्वाचे स्थान आहे. सूत्रांनुसार अमेरिकेच्या दौऱ्यावरून बुधवारी परतल्यानंतर लगेचच मोदींनी एक बैठक घेऊन ‘आधार’साठी होत असलेल्या नोंदणी कामाचा आढावा घेतला. येत्या डिसेंबरपर्यंत देशातील प्रत्येक नागरिकास ‘आधार कार्ड’ मिळावे यासाठी नोंदणी कामाला वेग देण्याचा आग्रह मोदींनी बैठकीला उपस्थित असलेल्या काही राज्यांच्या मुख्य सचिवांकडे धरला, असेही सूत्रांंनी सांगितले.सरकारी सूत्रांनुसार, दलालांना हद्दपार करून भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी ‘आधार’ हे महत्त्वाचे साधन आहे यावर आधीच्या संपुआ सरकारप्रमाणे आताच्या ‘रालोआ’ सरकारचाही ठाम विश्वास आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)