शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

मोदी भित्रे, मनोरुग्ण - केजरीवाल

By admin | Updated: December 15, 2015 11:32 IST

सीबीआयने कारवाई केली म्हणून अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनोरुग्ण, भित्रा म्हटलं आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १५ - दिल्ली सचिवालयातील कार्यालयावर मंगळवारी सकाळी सीबीआयने अचानक धाड टाकल्यामुळे दिल्लीतील आप सरकार  आणि केंद्र सरकारमध्ये नवीन संघर्ष सुरु झाला आहे. सीबीआयच्या या कारवाईवर संतप्त झालेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार ठरवलं आहे. 

मोदी भित्रे आणि मनोरुग्ण आहेत, मला ते राजकीयदृष्टया हाताळू शकत नाहीत म्हणून ते असे मार्ग अवलंबत असल्याचा आरोप केजरीवालांनी केला. छापेमारीवरुन अजूनही अस्पष्टता आहे. सचिवालयातील आपल्या कार्यालयावर छापा टाकल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या नव्हे तर,  दिल्लीचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर छापे टाकल्याच सीबीआयनं म्हटलं आहे. 
 
सीबीआय खोट बोलतं आहे. त्यांनी माझ्याच कार्यालयावर छापा मारला. मुख्यमंत्री कार्यालयाच्या फाईल्स शोधल्या जात आहेत. मोदींनी सांगावं त्यांना कुठल्या फाईल्स पाहिजेत. मी असा एकमेव मुख्यमंत्री आहे ज्याने भ्रष्टाचाराचा आरोप झाला म्हणून एक मंत्री आणि एका अधिका-याला हटवले आणि सीबीआयकडे ती प्रकरण सोपवली. राजेंद्र विरोधात सबळ पुरावे होते तर, मला का दिले नाहीत ? मी कारवाई केली असती असे केजरीवालांनी टि्वटसमध्ये म्हटले आहे. 
 
दरम्यान केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केजरीवालांचे आरोप फेटाळून लावले आहेत. सीबीआय केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली काम करत नाही, ते दिवस गेले जेव्हा काँग्रेसकडून सीबीआयचा गैरवापर व्हायचा, दिल्लीचे मुख्यमंत्री केंद्राबरोबर वाद घालतात आणि मोदींना जबाबदार धरतात ही एक फॅशनच झाली आहे  असे व्यंकय्या नायडू म्हणाले.