शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

मनरेगा योजना जारी राहणार

By admin | Updated: July 15, 2014 02:00 IST

हवामानाशी संबंधित कारणांच्या आधारावर दरवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) कामाच्या मागणीत अंतर पडत असते

नवी दिल्ली : हवामानाशी संबंधित कारणांच्या आधारावर दरवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) कामाच्या मागणीत अंतर पडत असते; परंतु या योजनेच्या कामात घट झालेली नाही आणि ही योजना यापुढेही सुरूच राहील, अशी ग्वाही केंद्र सरकारने सोमवारी राज्यसभेत दिली. मनरेगाच्या कार्यान्वयनात सुधारणा करण्यासाठी एक कृती योजना तयार करण्यात आली आहे, असे ग्रामीण विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा यांनी सांगितले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यात नमूद केलेल्या रोजगाराच्या आधारे देण्यात येणाऱ्या कामाच्या मागणीत घट झाल्याचे वृत्त कुशवाहा यांनी फेटाळून लावले. मनरेगा योजना जारी ठेवण्याची सरकारची इच्छा आहे. या योजनेची चांगल्याप्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी अनेक उपाय योजण्यात आले आहेत. राज्ये आणि मजुरांना निधी सहजरीत्या उपलब्ध करून देणे आणि मजुरी देण्याच्या कार्यात विलंब टाळण्यासाठी राज्यांना इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टिम सर्वव्यापी बनविण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे कुशवाहा यांनी स्पष्ट केले. राजीव चंद्रशेखर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले, राज्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ओम्बड्समन तैनात करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच या योजनेवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर सतर्कता आणि निगराणी समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत. मनरेगाअंतर्गत कायमस्वरूपी रोजगार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा अथवा तसा सरकारचा प्रस्ताव असल्याचा कुशवाहा यांनी यावेळी इन्कार केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)