शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगा योजना जारी राहणार

By admin | Updated: July 15, 2014 02:00 IST

हवामानाशी संबंधित कारणांच्या आधारावर दरवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) कामाच्या मागणीत अंतर पडत असते

नवी दिल्ली : हवामानाशी संबंधित कारणांच्या आधारावर दरवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) कामाच्या मागणीत अंतर पडत असते; परंतु या योजनेच्या कामात घट झालेली नाही आणि ही योजना यापुढेही सुरूच राहील, अशी ग्वाही केंद्र सरकारने सोमवारी राज्यसभेत दिली. मनरेगाच्या कार्यान्वयनात सुधारणा करण्यासाठी एक कृती योजना तयार करण्यात आली आहे, असे ग्रामीण विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा यांनी सांगितले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यात नमूद केलेल्या रोजगाराच्या आधारे देण्यात येणाऱ्या कामाच्या मागणीत घट झाल्याचे वृत्त कुशवाहा यांनी फेटाळून लावले. मनरेगा योजना जारी ठेवण्याची सरकारची इच्छा आहे. या योजनेची चांगल्याप्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी अनेक उपाय योजण्यात आले आहेत. राज्ये आणि मजुरांना निधी सहजरीत्या उपलब्ध करून देणे आणि मजुरी देण्याच्या कार्यात विलंब टाळण्यासाठी राज्यांना इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टिम सर्वव्यापी बनविण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे कुशवाहा यांनी स्पष्ट केले. राजीव चंद्रशेखर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले, राज्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ओम्बड्समन तैनात करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच या योजनेवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर सतर्कता आणि निगराणी समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत. मनरेगाअंतर्गत कायमस्वरूपी रोजगार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा अथवा तसा सरकारचा प्रस्ताव असल्याचा कुशवाहा यांनी यावेळी इन्कार केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)