शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

‘मनरेगा’त आता स्थायी संपत्ती निर्मितीवर भर

By admin | Updated: July 31, 2014 23:56 IST

आधीच्या ‘संपुआ’ सरकारने सुरु केलेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) सुरु राहणार की नाही

नवी दिल्ली : आधीच्या ‘संपुआ’ सरकारने सुरु केलेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) सुरु राहणार की नाही याविषयीची संदिग्धता दूर करत मोदी सरकारने ही योजना सुधारित निकष लागू करून व भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे उपाय योजून यापुढेही सुरु ठेवण्याचे ठरविले आहे.लोकसभेत ‘मनरेगा’वर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ग्रामीण विकासमंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली व या योजनेला महात्मा गांधी यांचे नाव असल्याने ती सुरु ठेवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.या योजनेतील कामांमुळे रोजगार उपलब्ध होण्यासोबतच ग्रामीण भागांमध्ये स्थायी सामाजिक संपत्तीचीही निर्मिती व्हावी यासाठी ‘मनरेगा’ कामांवर होणाऱ्या खर्चाचे साधने व मजुरी यांचे गुणोत्तर बदलण्यात येणार आहे, असेही गडकरी यांनी सांगितले. सध्या खर्चाचा ६० टक्के हिस्सा मजुरीचा व ४० टक्के हिस्सा साधनांचा असतो. आता हा गुणोत्तर ४९ टक्के मजुरी व ५१ टक्के साधने असे करण्यात येणार आाहे. यामुळे मूल्यवर्धित स्वरूपाची कामे होतील.खर्चाचे हे गुणोत्तर आता गाव पातळीऐवजी जिल्हा पातळीवर ठरविले जाईल, असेही मंत्र्यांनी सांगितले.आधीच्या संपुआ सरकारने निवडणुका डोळ््यापुठे ठेवून ही योजना घाईगर्दीत तयार केल्याने त्यात बऱ्याच उणिवा व त्रुटी आहेत व त्या आमचे सरकार दूर करील, असेही त्यांनी सांगितले.‘मनरेगा’ कामांच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी उपग्रहाच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल व त्यादृष्टीने हैदराबाद येथील संस्थेसोबत बैठकही झाली आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)