शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

खड्यातील पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू एमआयडीसीतील घटना : कंपनी व शेत मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

By admin | Updated: February 12, 2016 22:45 IST

जळगाव: कंपनीचे रसायनयुक्त पाणी साठविण्यासाठी केलेल्या खड्ड्यात बुडून विशाल मांगेलाल बारेला (वय ३) व खुशाल मांगेलाल बारेला (वय ५) दोन्ही रा.मेंदड्यापानी जि.सेंदवा या बालकांचा शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयडीसीत मृत्यू झाला. दरम्यान, कंपनीमालक व शेतमालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच मृत्यू झालेल्या बालकांच्या पालकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

जळगाव: कंपनीचे रसायनयुक्त पाणी साठविण्यासाठी केलेल्या खड्ड्यात बुडून विशाल मांगेलाल बारेला (वय ३) व खुशाल मांगेलाल बारेला (वय ५) दोन्ही रा.मेंदड्यापानी जि.सेंदवा या बालकांचा शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयडीसीत मृत्यू झाला. दरम्यान, कंपनीमालक व शेतमालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच मृत्यू झालेल्या बालकांच्या पालकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
मांगीलाल वाहर्‍या बारेला हे त्यांची पत्नी मनीषा यांच्यासह उदरनिर्वाहासाठी जळगावात आले होते. एमआयडीसीतील जगवानी नगरात धीरज महाजन यांच्या मालकीच्या अंजनी कन्स्ट्रक्शनच्या बांधकामावर बारेला हे मजूर व वॉचमन म्हणून कामाला आहेत. तेथेच त्यांचे वास्तव्य आहे. पत्नीही तेथेच काम करते.

आईकडे मागीतला भात
शुक्रवारी दुपारी विशाल व खुशाल या दोघं मुलांनी आई मनीषा हिच्याकडे जेवण मागितले. तिने भाजी व पोळी दिली असता त्यांनी ते जेवण नको म्हणून भाताची मागणी केली. मुलांच्या आवडीनुसार तिने भात तयार केला. त्या दरम्यानच्या वेळेत मुले ही खेळता-खेळता शेजारीच असलेल्या दिलीप चोपडा यांच्या शेतात पोहचले. तेथे सोना इंडस्ट्रीज या कंपनीने रसायनयुक्त पाणी साठविण्यासाठी १५ फुट खोल खड्डा केला आहे. त्या खड्ड्यात ही दोन्ही मुले पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

बापानेच काढले मुलांना
दुपारी जेवणाची वेळ झाल्याने मांगीलाल बारेला हे मुलांना आवाज देत होते, परंतु त्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ते त्यांना शोधत असतानाच शेतातील सांडपाण्याच्या खड्याच्या बाहेर दोघं मुलांच्या चपला पडलेला दिसल्या. शंकेची पाल चुकचुकल्याने बारेला यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या पाण्यात उडी घेतली. त्यात दोन्ही मुले ही मयतावस्थेत आढळून आली.

अन् बापाने हंबरडा फोडला
पाण्यातून मृतदेह काढताच बारेला यांनी मुलांना पाहून हंबरडा फोडला. हा प्रकार पाहून रहिवाशी व पत्नी मनीषा यांनीही घटनास्थळी धाव घेतली. मुलांना पाहून आईदेखील सुन्न झाली. काय करावे हे तिला सूचत नव्हते. परिसरातील महिलांनी तिला सावरले तर आबा भिका देशमुख यांनी स्वत:च्या रिक्षात टाकून बालकांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.