शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खड्यातील पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू एमआयडीसीतील घटना : कंपनी व शेत मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

By admin | Updated: February 12, 2016 22:45 IST

जळगाव: कंपनीचे रसायनयुक्त पाणी साठविण्यासाठी केलेल्या खड्ड्यात बुडून विशाल मांगेलाल बारेला (वय ३) व खुशाल मांगेलाल बारेला (वय ५) दोन्ही रा.मेंदड्यापानी जि.सेंदवा या बालकांचा शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयडीसीत मृत्यू झाला. दरम्यान, कंपनीमालक व शेतमालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच मृत्यू झालेल्या बालकांच्या पालकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

जळगाव: कंपनीचे रसायनयुक्त पाणी साठविण्यासाठी केलेल्या खड्ड्यात बुडून विशाल मांगेलाल बारेला (वय ३) व खुशाल मांगेलाल बारेला (वय ५) दोन्ही रा.मेंदड्यापानी जि.सेंदवा या बालकांचा शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयडीसीत मृत्यू झाला. दरम्यान, कंपनीमालक व शेतमालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच मृत्यू झालेल्या बालकांच्या पालकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
मांगीलाल वाहर्‍या बारेला हे त्यांची पत्नी मनीषा यांच्यासह उदरनिर्वाहासाठी जळगावात आले होते. एमआयडीसीतील जगवानी नगरात धीरज महाजन यांच्या मालकीच्या अंजनी कन्स्ट्रक्शनच्या बांधकामावर बारेला हे मजूर व वॉचमन म्हणून कामाला आहेत. तेथेच त्यांचे वास्तव्य आहे. पत्नीही तेथेच काम करते.

आईकडे मागीतला भात
शुक्रवारी दुपारी विशाल व खुशाल या दोघं मुलांनी आई मनीषा हिच्याकडे जेवण मागितले. तिने भाजी व पोळी दिली असता त्यांनी ते जेवण नको म्हणून भाताची मागणी केली. मुलांच्या आवडीनुसार तिने भात तयार केला. त्या दरम्यानच्या वेळेत मुले ही खेळता-खेळता शेजारीच असलेल्या दिलीप चोपडा यांच्या शेतात पोहचले. तेथे सोना इंडस्ट्रीज या कंपनीने रसायनयुक्त पाणी साठविण्यासाठी १५ फुट खोल खड्डा केला आहे. त्या खड्ड्यात ही दोन्ही मुले पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

बापानेच काढले मुलांना
दुपारी जेवणाची वेळ झाल्याने मांगीलाल बारेला हे मुलांना आवाज देत होते, परंतु त्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ते त्यांना शोधत असतानाच शेतातील सांडपाण्याच्या खड्याच्या बाहेर दोघं मुलांच्या चपला पडलेला दिसल्या. शंकेची पाल चुकचुकल्याने बारेला यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या पाण्यात उडी घेतली. त्यात दोन्ही मुले ही मयतावस्थेत आढळून आली.

अन् बापाने हंबरडा फोडला
पाण्यातून मृतदेह काढताच बारेला यांनी मुलांना पाहून हंबरडा फोडला. हा प्रकार पाहून रहिवाशी व पत्नी मनीषा यांनीही घटनास्थळी धाव घेतली. मुलांना पाहून आईदेखील सुन्न झाली. काय करावे हे तिला सूचत नव्हते. परिसरातील महिलांनी तिला सावरले तर आबा भिका देशमुख यांनी स्वत:च्या रिक्षात टाकून बालकांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.