शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

अन्नधान्याच्या किमती निश्चितीची पद्धत बदलणार

By admin | Updated: May 8, 2016 01:44 IST

अन्नधान्यांच्या किमती निश्चित करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषी, अर्थ आणि धोरण केंद्र संचालकाच्या अध्यक्षतेत स्थापित समितीने

- प्रमोद गवळी,  नवी दिल्ली

अन्नधान्यांच्या किमती निश्चित करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषी, अर्थ आणि धोरण केंद्र संचालकाच्या अध्यक्षतेत स्थापित समितीने एक अहवाल दिला असून, शिफारशींवर सरकार विचार करीत आहे.कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री मोहनभाई कुंदरिया यांनी राज्यसभेत काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, विद्यमान किमान आधारभूत मूल्य प्रणाली शेतकऱ्यांसाठी फारशी उपयुक्त राहिली नसल्याचे मानले जात आहे. त्यामुळे किमान आधारभूत मूल्य निर्धारणाच्या प्रक्रियात्मक पैलूंची तपासणी करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. निती आयोगाने केलेल्या एका अध्ययनात असे निदर्शनास आले की, ७८ टक्के शेतकऱ्यांना सरकारद्वारे घोषित आधारभूत किमतींमुळे प्रोत्साहन मिळाले आहे. या शेतकऱ्यांना लाभकारी मूल्यांमुळे शेतीच्या अत्याधुनिक पद्धती अवलंबण्यासाठी अध्ययनाअंतर्गत समाविष्ट करण्यात आले होते. यामध्ये उच्च दर्जाचे बियाणे, जैविक खत, रासायनिक खत, कीटकनाशके आणि पीक कापणीच्या अत्याधुनिक पद्धतींचा समावेश आहे. सरकार किमान आधारभूत मूल्यावर शेतकऱ्यांकडून त्यांचे उत्पादन खरेदी करीत असते. शेतकरी आपले उत्पादन जेथे त्यांना अधिक लाभ मिळेल तेथे विकण्यास स्वतंत्र आहेत, असेही कुंदरिया म्हणाले.