शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

अन्नधान्याच्या किमती निश्चितीची पद्धत बदलणार

By admin | Updated: May 8, 2016 01:44 IST

अन्नधान्यांच्या किमती निश्चित करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषी, अर्थ आणि धोरण केंद्र संचालकाच्या अध्यक्षतेत स्थापित समितीने

- प्रमोद गवळी,  नवी दिल्ली

अन्नधान्यांच्या किमती निश्चित करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषी, अर्थ आणि धोरण केंद्र संचालकाच्या अध्यक्षतेत स्थापित समितीने एक अहवाल दिला असून, शिफारशींवर सरकार विचार करीत आहे.कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री मोहनभाई कुंदरिया यांनी राज्यसभेत काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, विद्यमान किमान आधारभूत मूल्य प्रणाली शेतकऱ्यांसाठी फारशी उपयुक्त राहिली नसल्याचे मानले जात आहे. त्यामुळे किमान आधारभूत मूल्य निर्धारणाच्या प्रक्रियात्मक पैलूंची तपासणी करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. निती आयोगाने केलेल्या एका अध्ययनात असे निदर्शनास आले की, ७८ टक्के शेतकऱ्यांना सरकारद्वारे घोषित आधारभूत किमतींमुळे प्रोत्साहन मिळाले आहे. या शेतकऱ्यांना लाभकारी मूल्यांमुळे शेतीच्या अत्याधुनिक पद्धती अवलंबण्यासाठी अध्ययनाअंतर्गत समाविष्ट करण्यात आले होते. यामध्ये उच्च दर्जाचे बियाणे, जैविक खत, रासायनिक खत, कीटकनाशके आणि पीक कापणीच्या अत्याधुनिक पद्धतींचा समावेश आहे. सरकार किमान आधारभूत मूल्यावर शेतकऱ्यांकडून त्यांचे उत्पादन खरेदी करीत असते. शेतकरी आपले उत्पादन जेथे त्यांना अधिक लाभ मिळेल तेथे विकण्यास स्वतंत्र आहेत, असेही कुंदरिया म्हणाले.