शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

भारत-पाक सुरक्षा सल्लागारांची बैठक

By admin | Updated: December 6, 2015 22:59 IST

भारत-पाकिस्तान यांच्या सुरक्षा सल्लागारांची बैठक रविवारी थायलंडची राजधानी बँकॉक येथे पार पडली. चार तास चाललेल्या या बैठकीत उभय देशांनी दहशतवाद आणि जम्मू काश्मीरसह विविध मुद्यावर

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान यांच्या सुरक्षा सल्लागारांची बैठक रविवारी थायलंडची राजधानी बँकॉक येथे पार पडली. चार तास चाललेल्या या बैठकीत उभय देशांनी दहशतवाद आणि जम्मू काश्मीरसह विविध मुद्यावर चर्चा करीत रचनात्मक संवाद सुरू ठेवण्यावर सहमती दर्शवली.पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी समकक्ष नवाज शरीफ यांच्यातील संक्षिप्त भेटीच्या केवळ सहा दिवसानंतर दोन्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक झाल्याने ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नसीर जंजुआ यांच्यात सुमारे चार तास चर्चा चालली. भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि पाकिस्तानी परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी हेही यावेळी उपस्थित होती. बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केले. भारत-पाक पंतप्रधानांमध्ये पॅरिसमध्ये झालेली चर्चा पुढे नेत बँकॉकमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक झाली. अतिशय रचनात्मक वातावरणात ही बैठक पार पडली. यावेळी नियंत्रण रेषेवरील शांतता याशिवाय दहशतवाद, जम्मू-काश्मीर व अन्य मुद्यांवर चर्चा झाली, असे यात म्हटले आहे.यापूर्वी गत २३ आॅगस्टला नवी दिल्लीत डोवाल आणि पाकचे तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांच्या बैठक होणार होती. मात्र पाकिस्तानी उच्चायोगाने हुरियत नेत्यांना दिलेल्या निमंत्रणावरून उभय देशांत तणाव निर्माण झाला होता आणि ही बैठक रद्द झाली होती. अजीज यांनी नवी दिल्लीत हुरियत नेत्यांना भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे भारताने स्पष्ट केले होते. यानंतर पाकने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बैठक रद्द केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)