शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

१९ मार्चला अंधारात बघा भारत-पाक सामना - शिखर धवनचे आवाहन

By admin | Updated: March 16, 2016 12:13 IST

१९ मार्च रोजी अर्थ अवर डे साजरा होत असून घरातील अनावश्यक दिवे बंद करून भारत-पाकिस्तान सामना पहावा, असे आवाहन क्रिकेटपटू शिखर धवनने केले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १६ - येत्या शनिवारी, म्हणजेच १९ मार्च रोजी टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान दरम्यान होणा-या सामन्याकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे. कोलकात्यातील ईडन गार्डने येथील या सामन्यात कोणाची सरशी होते याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना हा सामना अंधारात बघावा लागण्याची शक्यता आहे आणि त्याचे कारण आहे 'अर्थ अवर डे'....
ग्लोबल वॉर्मिंगविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण जगभरात 'अर्थ अवर' साजरा केला जातो. या दिवशी कमीत कमी विजेचा वापर करण्यात यावा, हाच त्यामागील उद्देश असतो. त्यामुळे येत्या शनिवारी, म्हणजे १९ मार्च रोजी अर्थ अवर साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने रात्री ८.३० ते ९.३० या एका तासासाठी जगभरातील अनावश्यक दिवे बंद ठेवण्यात येणार आहेत 
भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन हा यंदा भारतात 'अर्थ अवर'विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून देशातील जास्तीत जास्त लोकांनी अर्थ अवर पाळावा यासाठी त्याने आवाहन केले आहे. ' देशभरातील क्रिकेट रसिकांनी शनिवारी एका तासासाठी घरातील अनावश्यक दिवे तसेच वीजेची इतर उपकरणे बंद करावीत आणि भारत-पाकिस्तान सामना अंधारात पहावा' असे आवाहन धवनने केले आहे. ' जगातील वातावरणात होणारा बदल ही एक समस्या असून ती सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत,' असेही शिखर धवनने नमूद केले आहे. 
विशेष म्हणजे या वेळात इंडिया गेट, राष्ट्रपती भवन सह देशातील काही महत्वाच्या ठिकाणांतील दिवेही बंद ठेवण्यात येणार आहेत.