शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
5
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
6
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
7
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
8
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
9
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
10
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
11
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
12
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
13
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
14
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
15
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
16
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
17
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
18
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
19
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
20
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

मणिपूर पुन्हा भूकंपाने हादरले, ६ ठार तर १०० जखमी

By admin | Updated: January 4, 2016 11:25 IST

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी पहाटेच्या सुमारास पूर्व व ईशान्य भारत हादरलेला असतानाच मणिपूरमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास पुन्हा भूकंपाचे धक्के बसले.

नलाइन लोकमत
नवी दिल्ली, ४ -  भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी पहाटेच्या सुमारास पूर्व व ईशान्य भारत हादरलेला असतानाच मणिपूरमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास पुन्हा भूकंपाचे धक्के बसले. या दुर्दैवी घटनेत आत्तापर्यंत ६ जण ठार तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. आज पहाटे भारत-म्यानमार सीमेवर बसलेल्या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल एवढी मोजली गेली. तर साडनेऊच्या सुमारास मणिपूरमध्ये पुन्हा झालेल्या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपामुळे घरांना तडे जाऊन खांब कोसळल्याच्या घटनाही घडल्या असून मणीपूरमध्ये सर्वाधिक नुकसान झाले तर इंफाळमध्ये ३५ जण जखमी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी यांच्याशी फोनवरून संपर्क साधत भूकंपग्रस्त भागातील परिस्थितीची माहिती घेतली आहे. तसेच या परिस्थितीचा व झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली.
दरम्यान भूकंपातील जखमींना प्राथमिक उपचारासाठी शहरातील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मदतकार्यासाठी NDRFची टीम इंफाळला रवाना झाली आहे.
आज पहाटे साडेचारच्या सुमारास झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू इंफाळपासून ३३ कि.मी दूर असल्याची माहिती मिळाली आहे. भारतातील आसाम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, बिहार, झारखंड राज्यासह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले. बांगलादेश, म्यानमारमध्ये अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. 
भूकंपामुळे इम्फाळमध्ये अनेक घरांचे मोठं नुकसान झाले असून भिंतीनाही तडे गेले. भूकंपाचे तीव्र धक्के जाणवताच घाबरलेले नागरिक घराबाहेर पडून रस्त्यांवर एकत्रित आल्याचे चित्र अनेक ठिताणी दिसत होते.