शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

मनेका गांधी आणीबाणीबद्दल अनभिज्ञ नव्हत्या - आर. के. धवन

By admin | Updated: June 24, 2015 10:03 IST

मनेका गांधींना आणीबाणीविषयी सर्व माहिती होती व त्या प्रत्येक पावलावर त्यांचे पती संजय गांधी यांच्यासोबत होत्या, असा खुलासा माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे खासगी सचिव आर. के.धवन यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि, २४ - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात जाहीर केलेल्या आणीबाणीला या वर्षी चाळीस वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांचे खासगी सचिव आर. के. धवन यांनी आणीबाणीबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहे.  मनेका गांधींना आणीबाणीविषयी सर्व माहिती होती व त्या प्रत्येक पावलावर त्यांचे पती संजय गांधी यांच्यासोबत होत्या, असे आर. के. धवन यांनी म्हटले आहे. तसेच राजीव व सोनिया गांधी यांच्या मनात आणीबाणीविषयी कोणताही संदेह अथवा रुखरूख नव्हती असा खुलासाही धवन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 
इंदिरा गांधींनी लादलेल्या या आणीबाणीचा भारतीय जनता पक्षाने प्रखर विरोध केला होता, त्यावेळी भाजपाचे अनेक नेते तुरूंगातही गेले होते. आणीबाणीवरून भाजपासह अनेकांनी इंदिरा गांधींवर टीकेचा भडिमार केला होता, मात्र असे असतानाही सध्या भाजपात असलेल्या व मंत्रीपद भूषविणा-या मनेका गांधींना मात्र या सर्व गोष्टींबद्दल पूर्वकल्पना होती हे समोर आल्याने मनेका गांधी अडचणीत सापडू शकतात. 
पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री एस.एस.राय यांनी १९७५ सालच्या जानेवारी महिन्यातच इंदिरा गांधी यांना आणीबाणी जाहीर करण्याचा सल्ला दिल्ला होता. तत्कालीन राष्ट्रपती फखरूद्दीन अली अहमद यांची आणीबाणीच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यास हरकत नव्हती, त्यांनी त्यासाठी तत्काळ सहमती दर्शवल्याचेही धवन यांनी नमूद केले आहे. 
मात्र जाहीर करण्यात आलेली आणीबाणी इंदिरा यांची राजकीय कारकिर्द वाचवण्यासाठी लादण्यात आली नव्हती, उलट त्या स्वत:च राजीनामा देण्यास तयार होत्या असेही धवन यांनी स्पष्ट केले. १९७५ सालच्या जून महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांती निवड रद्द केल्याचा निर्णय ऐकल्यावरच त्यांनी आपला राजीनामा तयार करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे राजीनामा टाईप करून तयारही होता मात्र मंत्रीमंडळातील इतर सहका-यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा देण्यापासून रोखले आणि त्या राजीनाम्यावर त्यांनी स्वाक्षरी केली नाही, असे धवन यांनी म्हटले आहे.