शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मनेका गांधी आणीबाणीबद्दल अनभिज्ञ नव्हत्या - आर. के. धवन

By admin | Updated: June 24, 2015 10:03 IST

मनेका गांधींना आणीबाणीविषयी सर्व माहिती होती व त्या प्रत्येक पावलावर त्यांचे पती संजय गांधी यांच्यासोबत होत्या, असा खुलासा माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे खासगी सचिव आर. के.धवन यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि, २४ - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात जाहीर केलेल्या आणीबाणीला या वर्षी चाळीस वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांचे खासगी सचिव आर. के. धवन यांनी आणीबाणीबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहे.  मनेका गांधींना आणीबाणीविषयी सर्व माहिती होती व त्या प्रत्येक पावलावर त्यांचे पती संजय गांधी यांच्यासोबत होत्या, असे आर. के. धवन यांनी म्हटले आहे. तसेच राजीव व सोनिया गांधी यांच्या मनात आणीबाणीविषयी कोणताही संदेह अथवा रुखरूख नव्हती असा खुलासाही धवन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 
इंदिरा गांधींनी लादलेल्या या आणीबाणीचा भारतीय जनता पक्षाने प्रखर विरोध केला होता, त्यावेळी भाजपाचे अनेक नेते तुरूंगातही गेले होते. आणीबाणीवरून भाजपासह अनेकांनी इंदिरा गांधींवर टीकेचा भडिमार केला होता, मात्र असे असतानाही सध्या भाजपात असलेल्या व मंत्रीपद भूषविणा-या मनेका गांधींना मात्र या सर्व गोष्टींबद्दल पूर्वकल्पना होती हे समोर आल्याने मनेका गांधी अडचणीत सापडू शकतात. 
पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री एस.एस.राय यांनी १९७५ सालच्या जानेवारी महिन्यातच इंदिरा गांधी यांना आणीबाणी जाहीर करण्याचा सल्ला दिल्ला होता. तत्कालीन राष्ट्रपती फखरूद्दीन अली अहमद यांची आणीबाणीच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यास हरकत नव्हती, त्यांनी त्यासाठी तत्काळ सहमती दर्शवल्याचेही धवन यांनी नमूद केले आहे. 
मात्र जाहीर करण्यात आलेली आणीबाणी इंदिरा यांची राजकीय कारकिर्द वाचवण्यासाठी लादण्यात आली नव्हती, उलट त्या स्वत:च राजीनामा देण्यास तयार होत्या असेही धवन यांनी स्पष्ट केले. १९७५ सालच्या जून महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांती निवड रद्द केल्याचा निर्णय ऐकल्यावरच त्यांनी आपला राजीनामा तयार करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे राजीनामा टाईप करून तयारही होता मात्र मंत्रीमंडळातील इतर सहका-यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा देण्यापासून रोखले आणि त्या राजीनाम्यावर त्यांनी स्वाक्षरी केली नाही, असे धवन यांनी म्हटले आहे.